शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

देशाचा इतिहास केवळ तो नाही, जो गुलामगिरीच्या मानिसकतेसोबत लिहिणाऱ्यांनी लिहिला : पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 14:10 IST

PM Narendra Modi Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं विकासकामांचं भूमिपूजन

ठळक मुद्देउत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं विकासकामांचं भूमिपूजनमहाराजा सुहेलदेव जी यांच्या भव्य स्मारकाची पायाभरणी करण्याचं भाग्य, मोदींचं वक्तव्य

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तौरा तलावाच्या विकासकामांचं भूमिपूजन केलं. याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी महाराजा सुहेलदेव स्वशासी राज्य आरोग्य महाविद्यालय, बहराईचचं लोकर्पणही केलं. यादरम्यान, त्यांनी डिजिटल माध्यमातूल उपस्थितांना संबोधित केलं. "आज मला बहराइचमध्ये महाराजा सुहेलदेव जी यांच्या भव्य स्मारकाची पायाभरणी करण्याचं भाग्य लाभलं आहे. हे आधुनिक आणि भव्य स्मारक ऐतिहासिक चित्तौरा तलावाचा विकास, बहराइचवरील महाराजा सुहेलदेल यांचा आशीर्वाद वाढवेल आणि येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरित करेल," असं मोदी यावेळी म्हणाले."भारताचा इतिहास केवळ तोच नाही, जो देशाला गुलाम बनवणाऱ्यांनी, गुलामगिरीच्या मानसिकतेसोबत इतिहास लिहिणाऱ्यांनी लिहिला. भारताचा इतिहास तो आहे जो भारताच्या सामान्य जनतेत, भारताच्या लोकगाथांमध्ये आहे, जो पिढ्यानपिढ्या पुढे जात आहे," असं मोदी यावेळी म्हणाले. बहराइचसारख्या विकासाच्या महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधांची वाढ केल्यास येथील लोकांचे जीवन सुकर होईल. त्याचे फायदे केवळ श्रावस्ती, बलरामपूर, सिद्धार्थनगर या आसपासच्या जिल्ह्यांनाच नाही तर नेपाळहून येणाऱ्या रूग्णांनाही मिळणार असल्याचं ते म्हणाले. "देशातील पाचशेपेक्षा अधिक संस्थानांना एकत्र करण्याचं कठिण काम करणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेस यांच्यासोबत काय करण्यात आलं याची माहिती देशातील प्रत्येकाला आहे. आज जगातील सर्वात मोठी प्रतीमा स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांची आहे. जी आम्हाला आजही प्रेरणा देत आहे," असं मोदींनी यावेळी नमूद केलं.  देशात आज अनेक असे सेनानी आहेत ज्यांचं योगदान अनेक बाबींमुळे मान्य केलं गेलं नाही. चौरी-चौराच्या वीरांसोबत काय झालं, ते आपण विसरू शकतो का? महाराजा सुहेलदेव आणि भारतीयतेच्या रक्षेसाठी त्यांच्या प्रयत्नांबाबतही असंच करण्यात आल्याचंही ते म्हणाले. "गेल्या काही काळापासून देशभरात इतिहास, आस्था, अध्यात्म आणि संस्कृतीशी निगजीत जोडलेल्या स्मारकांच्या निर्मितीचा प्रयत्न केला जात आहे. पर्यटनाला चालना देणं हा त्यामागील उद्देश आहे. उत्तर प्रदेश तर पर्यटन, तीर्थक्षेत्र या दोन्ही बाबींमध्ये समृद्ध आहे आणि त्याच्या क्षमताही अपार आहेत. उत्तर प्रदेश हे असं राज्य आहे ज्या ठिकाणी सर्वाधिक पर्यटक येत असतात. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यातही उत्तर प्रदेश पहिल्या तीन राज्यांमध्ये आला आहे," असंही पंतप्रधानांनी नमूद केलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ