शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

पंतप्रधान मोदी हे तर ब्लफमास्टर; सोनिया गांधी यांची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 05:15 IST

सतत खोटे बोलत राहणे, निष्कारण बढाया मारणे आणि आपल्या विरोधकांना धमकावणे हेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली पाच वर्षे करीत आले आहेत. पंतप्रधान हे ब्लफमास्टरच आहेत.

नवी दिल्ली : सतत खोटे बोलत राहणे, निष्कारण बढाया मारणे आणि आपल्या विरोधकांना धमकावणे हेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली पाच वर्षे करीत आले आहेत. पंतप्रधान हे ब्लफमास्टरच आहेत. त्यांच्या सरकारचेही तेच तत्वज्ञान आहे, अशी जोरदार टीका यूपीएच्या अध्यक्ष व काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी बुधवारी केली.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस खासदारांच्या बैठकीत बोलताना सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवरच्या पाच वर्षांच्या कामकाजावर टीकास्त्र सोडले. बऱ्याच काळाने त्यांचे इतके आक्रमक भाषण ऐकायला मिळाले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या खासदारांनी व्यक्त केली. मोदी सरकार पूर्णपणे हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. दिलेली आश्वासने पाच वर्षे पूर्ण होत आली, सरकारने पूर्ण केलेली नाहीत, असे सांगताना सोनिया गांधी यांनी रोजगाराचे आश्वासन, सामाजिक सलोखा याबरोबरच राफेल विमान खरेदीतील घोटाळ्याचाही उल्लेख केला.नोटाबंदी हा मोदी सरकारचा मोठा घोटाळा होता. नोटाबंदी व चुकीच्या पद्धतीने तसेच घाईघाईने जीएसटी लागू केल्याने अनेक उद्योग व व्यवसाय गाळात गेले, लाखो लोकांचा रोजगार गेला, याचा उल्लेख करून सोनिया गांधी म्हणाल्या की तरीही मोदी सरकार या दोन्हीला आपले यश मानत आहे.मात्र मोदी सरकारची विश्वासार्हता पूर्णपणे लयाला गेली आहे. जनता या सरकारवर नाराज आहे. सरकारमुळे देशात ठिकठिकाणी निष्कारण तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.जनतेचा विश्वासघातदिलेली आश्वासने पूर्ण न करणे म्हणजे जनतेचा विश्वासघातच होय आणि तो विश्वासघात मोदी सरकारने केला आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. या सरकारने संसदेचे महत्त्व कमी केले. महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेच्या वेळी पंतप्रधान मोदी हजरच राहिले नाहीत, हे त्याचे उदाहरण आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, अशी अस्वस्थता यापूर्वी पाहायला मिळाली नव्हती.राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात आपला पक्ष अतिशय आक्रमकपणे भाजपाच्या विचारसरणीशी व मोदी सरकारच्या भ्रष्टाचाराशी लढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले; पण ही लढाई यापुढे कायम सुरू राहील. संसदेचे अधिवेशन संपले असल्याने सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊ न ही लढाई सुरू ठेवायला हवी, असे ते म्हणाले.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी