शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

मुलं अधिक जबाबदारीनं वागली, तरच मुलींना सुरक्षित वाटेल- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 8:15 PM

कथुआ, उन्नव बलात्कार प्रकरणावर मोदींचं भाष्य

मध्य प्रदेश: कथुआ आणि उन्नव बलात्कार प्रकरणानंतर केंद्र सरकारनं अध्यादेश आणून 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी मुलांनी अधिक जबाबदारीनं वागण्याची गरज व्यक्त केली. 'लोकांनी त्यांच्या मुलींना सन्मान द्यायला हवा आणि मुलींना सुरक्षित वातावरण पुरवण्यासाठी मुलांना त्यांच्यावर असणाऱ्या जबाबदारीची जाणीव करुन द्यायला हवी,' असं मोदींनी मध्यप्रदेशातील मांडला येथे बोलताना म्हटलं. महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी सामाजिक आंदोलन छेडण्याचं आवाहनही त्यांनी केलं. मांडला येथे आयोजित रॅलीत पंतप्रधान मोदींआधी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं भाषण झालं. त्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारनं शनिवारी घेतलेल्या निर्णयाचा उल्लेख केला. 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला थेट फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय शनिवारी मोदींच्या मंत्रिमंडळानं घेतला. याबद्दल बोलताना, दिल्लीतील सरकार जनभावना लक्षात घेऊनच निर्णय घेत असल्याचं मोदींनी म्हटलं. लोकांच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचंही मोदी म्हणाले. कथुआ आणि उन्नव प्रकरणानंतर भाजपवर टीकेची झोड उठली होती. उन्नवमधील बलात्कार प्रकरणात भाजपच्या आमदाराला अटक झाली आहे. तर कथुआमधील बलात्कार प्रकरणातील आरोपीसाठी भाजपचे आमदार रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे जनभावना अतिशय तीव्र झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेत पॉक्सो कायद्यात बदल केला. याआधी अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जात होती. त्यात मोदी सरकारनं बदल करत अशा प्रकारचं संतापजनक कृत्य करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला.  

टॅग्स :Rapeबलात्कारNarendra Modiनरेंद्र मोदीKathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरणUnnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण