शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

ब्राह्मणांचा पाठिंबा मिळविण्यासाठी डावपेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 06:41 IST

उत्तर प्रदेश : मुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेसने खुले केले नाहीत पत्ते

ठळक मुद्देबहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष पाठिंब्यासाठी या समाजाची मनधरणी करीत आहे, तर भाजपने या समाजाचा पाठिंबा गृहीत धरला आहे.

व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कोणताही राजकीय पक्ष ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून पुढे करणार नसला तरी विधानसभेच्या आगामी निवडणुकीत या समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी उत्सुक आहेत. सत्तारूढ भाजप आणि विरोधी समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाकडे आपापले मुख्यमंत्रिपदाचे चेहरे आहेत. काँग्रेसने या मुद्द्यांवर अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत. अल्पसंख्याक समुदायाप्रमाणे या समाजाने निर्णायकपणे मते दिली तर हा समाज निवडणूक निकालावर प्रभाव टाकू शकतो.

बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष पाठिंब्यासाठी या समाजाची मनधरणी करीत आहे, तर भाजपने या समाजाचा पाठिंबा गृहीत धरला आहे. दुसरीकडे, काँग्रेस प्रियांका कार्ड  किंवा ब्राह्मण समाजाचे कार्ड खेळावे की नाही, या द्विधेत आहे; परंतु, निवडणुकीनंतरची स्थिती पक्षाच्या दृष्टीने प्रसंगोचित ठरावी म्हणून विभाजित जनादेश काँग्रेसला हवा आहे. 

काय आहे राज्यातील इतिहास?n    उत्तर प्रदेशात  १५ टक्के ब्राह्मण समाज आहे. पूर्वी, राज्यांत काँग्रेसच्या विजयाच्या समीकरणात ब्राह्मण, मुस्लिम आणि दलित समाजाची भागीदारी असायची. परंतु, १९९० मध्ये मंडल आयोग आणि अयोध्या आंदोलनामुळे हे सामाजिक समीकरण दुभंगले.n    विधानसभेच्या मागच्या निवडणुकीत निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून प्रियांका गांधी किंवा ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला पुढे करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, शेवटच्या मिनिटाला समाजवादी पक्ष - बसपशी हातमिळवणी केली. त्यावेळी काँग्रेसला विधानसभेत दहापेक्षाही कमी जागा मिळाल्या होत्या.

टॅग्स :Electionनिवडणूकbrahman mahasanghब्राह्मण महासंघUttar Pradeshउत्तर प्रदेश