शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 11:24 IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. नेपाळच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबासारख्या संघटना भारतावर हल्ला करण्यासाठी नेपाळची भूमी वापरू शकतात. भारताने नुकत्याच 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी लॉन्चपॅड्स उद्ध्वस्त केल्यानंतर हे विधान समोर आले आहे.

नेपाळच्या राष्ट्रपतींच्या सल्लागारांकडून गंभीर चिंता व्यक्त!काठमांडूमधील 'दक्षिण आशियातील दहशतवाद: प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेचे आव्हान' या विषयावरील कार्यक्रमात नेपाळचे राष्ट्रपतींचे सल्लागार सुनील बहादूर थापा यांनी हे वक्तव्य केले. हा कार्यक्रम नेपाळ इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड एंगेजमेंटने आयोजित केला होता.

खुली सीमा बनली चिंतेची बाबनेपाळ आणि भारतादरम्यानची खुली सीमा आणि व्हिसा-मुक्त व्यवस्था ही देखील चिंतेची मुख्य बाब बनली आहे. थापा यांच्या मते, दहशतवादी याच व्यवस्थेचा फायदा घेऊन भारतात प्रवेश करू शकतात. नेपाळचे खासदार शिशिर खनाल यांनी पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत म्हटले की, आता भारत आणि नेपाळला एकत्र येऊन सीमा व्यवस्थापन अधिक मजबूत करावे लागेल. त्यांनी हाय-टेक पाळत तंत्रज्ञान, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि संयुक्त दहशतवादविरोधी कारवाई करण्याची गरज सुचवली.

फक्त भारतालाच नाही, नेपाळलाही फटका बसतोय!नेपाळचे माजी संरक्षण मंत्री मिनेंद्र रिजाल यांनी सांगितले की, पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा दिल्याने केवळ भारतालाच नाही, तर नेपाळला आणि स्वतः पाकिस्तानलाही नुकसान सहन करावे लागत आहे. दहशतवादी हल्ल्यांचा थेट परिणाम नेपाळवरही होतो, असे ते म्हणाले. पहलगाम हल्ल्यात एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला, हे त्याचेच एक उदाहरण आहे.

नेपाळमध्ये यापूर्वीही दिसले आहेत दहशतवादी कनेक्शननेपाळच्या भूमीवर दहशतवादाशी संबंधित अनेक जुनी प्रकरणेही समोर आली आहेत. 'द वीक'च्या बातमीनुसार, २०१७ मध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याला सोनौली सीमेवर एसएसबीने अटक केली होती. १९९९ मध्ये काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या 'आयसी ८१४' विमानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. १८ मे २०२५ रोजी लष्कर-ए-तैयबाच्या नेपाळ मॉड्यूलच्या प्रमुखाची पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हत्या करण्यात आली होती. या सर्व घटनांनी भारत-नेपाळ सीमेवरील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

टॅग्स :NepalनेपाळPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवाद