शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 11:24 IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. नेपाळच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबासारख्या संघटना भारतावर हल्ला करण्यासाठी नेपाळची भूमी वापरू शकतात. भारताने नुकत्याच 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी लॉन्चपॅड्स उद्ध्वस्त केल्यानंतर हे विधान समोर आले आहे.

नेपाळच्या राष्ट्रपतींच्या सल्लागारांकडून गंभीर चिंता व्यक्त!काठमांडूमधील 'दक्षिण आशियातील दहशतवाद: प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेचे आव्हान' या विषयावरील कार्यक्रमात नेपाळचे राष्ट्रपतींचे सल्लागार सुनील बहादूर थापा यांनी हे वक्तव्य केले. हा कार्यक्रम नेपाळ इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड एंगेजमेंटने आयोजित केला होता.

खुली सीमा बनली चिंतेची बाबनेपाळ आणि भारतादरम्यानची खुली सीमा आणि व्हिसा-मुक्त व्यवस्था ही देखील चिंतेची मुख्य बाब बनली आहे. थापा यांच्या मते, दहशतवादी याच व्यवस्थेचा फायदा घेऊन भारतात प्रवेश करू शकतात. नेपाळचे खासदार शिशिर खनाल यांनी पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत म्हटले की, आता भारत आणि नेपाळला एकत्र येऊन सीमा व्यवस्थापन अधिक मजबूत करावे लागेल. त्यांनी हाय-टेक पाळत तंत्रज्ञान, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि संयुक्त दहशतवादविरोधी कारवाई करण्याची गरज सुचवली.

फक्त भारतालाच नाही, नेपाळलाही फटका बसतोय!नेपाळचे माजी संरक्षण मंत्री मिनेंद्र रिजाल यांनी सांगितले की, पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा दिल्याने केवळ भारतालाच नाही, तर नेपाळला आणि स्वतः पाकिस्तानलाही नुकसान सहन करावे लागत आहे. दहशतवादी हल्ल्यांचा थेट परिणाम नेपाळवरही होतो, असे ते म्हणाले. पहलगाम हल्ल्यात एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला, हे त्याचेच एक उदाहरण आहे.

नेपाळमध्ये यापूर्वीही दिसले आहेत दहशतवादी कनेक्शननेपाळच्या भूमीवर दहशतवादाशी संबंधित अनेक जुनी प्रकरणेही समोर आली आहेत. 'द वीक'च्या बातमीनुसार, २०१७ मध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याला सोनौली सीमेवर एसएसबीने अटक केली होती. १९९९ मध्ये काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या 'आयसी ८१४' विमानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. १८ मे २०२५ रोजी लष्कर-ए-तैयबाच्या नेपाळ मॉड्यूलच्या प्रमुखाची पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हत्या करण्यात आली होती. या सर्व घटनांनी भारत-नेपाळ सीमेवरील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

टॅग्स :NepalनेपाळPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवाद