शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

India-Pakistan: “पाकिस्तानचं विभाजन करण्याचा प्लॅन १९६५ मध्येच; फक्त अंमलबजावणी १९७१ च्या युद्धात झाली”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 11:06 IST

नौदल अधिकारी अनिल कुमार चावला हे १९७१ भारत-पाकिस्तान युद्धाच्या विजयाची गोल्डन जुबली सेलिब्रेशनसाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते

ठळक मुद्दे१९७० ची निवडणुकीत ही पाकिस्तानातील पहिली निवडणूक होती ज्यात वन पर्सन वन वोट नियम लागू करण्यात आला.शेख मजीबूर रहमान यांनी १६० जागा जिंकल्या तर पश्चिम पाकिस्तानात भुट्टो यांना केवळ ८१ जागांवर विजय मिळाला.१९६५ मध्ये पाकिस्तानचे दोन भाग करणं हा विचार पहिल्या टप्प्यात होता.

बंगळुरू – भारताने पूर्व पाकिस्तानला पश्चिमी पाकिस्तानपासून(Pakistan) वेगळं करण्याचा विचार १९६५ मध्ये सुरु केला होता. क्लासिफाइड कागदपत्रांचा हवाला देत या गोष्टीला पुरावा दिला आहे. उत्तर पूर्वेकडे दहशतवादी कारवायांना ISI प्रोत्साहन दिल्यामागे हे मोठं कारण होतं असा खुलासा नौदलाचे दक्षिण फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ वाइस एडमिरल अनिल कुमार चावला यांनी केला आहे.

नौदल अधिकारी अनिल कुमार चावला हे १९७१ भारत-पाकिस्तान युद्धाच्या विजयाची गोल्डन जुबली सेलिब्रेशनसाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. भारताने पाकिस्तानला १९७१ च्या लढाईत मात दिली होती. त्यानंतर पूर्व पाकिस्तानात नवीन सरकार उभं करण्यास मदत केली. त्यानुसार बांग्लादेश(Bangladesh) अस्तित्वात आला. १९६५ च्या युद्धानंतर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान वेगळा कसा करायचा याचा विचार सुरू झाला असं त्यांनी सांगितले.

तसेच त्यावेळी भारत(India) कमकुवत होता कारण काँग्रेसचं विभाजन झालं होतं. इंदिरा गांधी कशातरी पंतप्रधान बनल्या. विरोधी पक्षाने गुंगी बाहुली म्हणून इंदिरा गांधींना हिणवू लागले. त्यामुळे इंदिरा जास्त काळ टिकतील असं वाटत नव्हतं. १९६९ मध्ये यहिया खानने टिक्का खानकडून सत्ता मिळवली होती. १९५४ वन यूनिट जियोपॉलिटिकल प्रोग्राम भंग करण्याची कहानी सुरु झाली. १९७० मध्ये निवडणुकीची घोषणा झाली अशी माहितीही अनिल कुमार चावला यांनी दिली.

त्याशिवाय १९७० ची निवडणुकीत ही पाकिस्तानातील पहिली निवडणूक होती ज्यात वन पर्सन वन वोट नियम लागू करण्यात आला. इंदिरा गांधी यांनी भारतात १९७१ मध्ये दीडवर्षापूर्वीच निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर १९७० मध्ये अचानक सर्वकाही बदललं. पूर्व पाकिस्तानात शेख मजीबूर रहमान यांनी १६० जागा जिंकल्या तर पश्चिम पाकिस्तानात भुट्टो यांना केवळ ८१ जागांवर विजय मिळाला. रहमान यांना पंतप्रधानपदाचा उत्तराधिकारी मानलं गेले.

कारवाई करण्यास भारत का सज्ज झाला?

वाइस एडमिरल चावला यांच्यानुसार, १९६५ मध्ये पाकिस्तानचे दोन भाग करणं हा विचार पहिल्या टप्प्यात होता. ३० जानेवारी १९७१ मध्ये काश्मीरी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण करून लाहौरला घेऊन जाणं टर्निंग पॉईंट ठरलं. भारताने ओवरफ्लाइट सुविधा थांबवली. त्यामुळे पूर्व पाकिस्तानमध्ये हत्यारं घेऊन जाण्यास रोखलं गेले. कोलंबोहून उड्डाण करणं कठीण आणि खर्चिक होतं. रहमान निवडणुकीत जिंकूनही पंतप्रधान बनू दिलं नाही. तेव्हा रहमान यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली. भारताने एप्रिल १९७१ मध्ये युद्धात दखल देण्यास सुरुवात केली.७ मार्चला इंदिरा गांधी यांनी बहुमताने केंद्रात सत्ता मिळवली. त्यामुळे अनेक गोष्टी बदलल्या. भारत की दुर्गा असं इंदिरा गांधी यांना म्हटलं गेले. १९७१ चं युद्धात सर्व प्रकारच्या सिद्धांतांचे पालन झाले असं अनिल कुमार चावला म्हणाले.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेश