शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

India-Pakistan: “पाकिस्तानचं विभाजन करण्याचा प्लॅन १९६५ मध्येच; फक्त अंमलबजावणी १९७१ च्या युद्धात झाली”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 11:06 IST

नौदल अधिकारी अनिल कुमार चावला हे १९७१ भारत-पाकिस्तान युद्धाच्या विजयाची गोल्डन जुबली सेलिब्रेशनसाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते

ठळक मुद्दे१९७० ची निवडणुकीत ही पाकिस्तानातील पहिली निवडणूक होती ज्यात वन पर्सन वन वोट नियम लागू करण्यात आला.शेख मजीबूर रहमान यांनी १६० जागा जिंकल्या तर पश्चिम पाकिस्तानात भुट्टो यांना केवळ ८१ जागांवर विजय मिळाला.१९६५ मध्ये पाकिस्तानचे दोन भाग करणं हा विचार पहिल्या टप्प्यात होता.

बंगळुरू – भारताने पूर्व पाकिस्तानला पश्चिमी पाकिस्तानपासून(Pakistan) वेगळं करण्याचा विचार १९६५ मध्ये सुरु केला होता. क्लासिफाइड कागदपत्रांचा हवाला देत या गोष्टीला पुरावा दिला आहे. उत्तर पूर्वेकडे दहशतवादी कारवायांना ISI प्रोत्साहन दिल्यामागे हे मोठं कारण होतं असा खुलासा नौदलाचे दक्षिण फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ वाइस एडमिरल अनिल कुमार चावला यांनी केला आहे.

नौदल अधिकारी अनिल कुमार चावला हे १९७१ भारत-पाकिस्तान युद्धाच्या विजयाची गोल्डन जुबली सेलिब्रेशनसाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. भारताने पाकिस्तानला १९७१ च्या लढाईत मात दिली होती. त्यानंतर पूर्व पाकिस्तानात नवीन सरकार उभं करण्यास मदत केली. त्यानुसार बांग्लादेश(Bangladesh) अस्तित्वात आला. १९६५ च्या युद्धानंतर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान वेगळा कसा करायचा याचा विचार सुरू झाला असं त्यांनी सांगितले.

तसेच त्यावेळी भारत(India) कमकुवत होता कारण काँग्रेसचं विभाजन झालं होतं. इंदिरा गांधी कशातरी पंतप्रधान बनल्या. विरोधी पक्षाने गुंगी बाहुली म्हणून इंदिरा गांधींना हिणवू लागले. त्यामुळे इंदिरा जास्त काळ टिकतील असं वाटत नव्हतं. १९६९ मध्ये यहिया खानने टिक्का खानकडून सत्ता मिळवली होती. १९५४ वन यूनिट जियोपॉलिटिकल प्रोग्राम भंग करण्याची कहानी सुरु झाली. १९७० मध्ये निवडणुकीची घोषणा झाली अशी माहितीही अनिल कुमार चावला यांनी दिली.

त्याशिवाय १९७० ची निवडणुकीत ही पाकिस्तानातील पहिली निवडणूक होती ज्यात वन पर्सन वन वोट नियम लागू करण्यात आला. इंदिरा गांधी यांनी भारतात १९७१ मध्ये दीडवर्षापूर्वीच निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर १९७० मध्ये अचानक सर्वकाही बदललं. पूर्व पाकिस्तानात शेख मजीबूर रहमान यांनी १६० जागा जिंकल्या तर पश्चिम पाकिस्तानात भुट्टो यांना केवळ ८१ जागांवर विजय मिळाला. रहमान यांना पंतप्रधानपदाचा उत्तराधिकारी मानलं गेले.

कारवाई करण्यास भारत का सज्ज झाला?

वाइस एडमिरल चावला यांच्यानुसार, १९६५ मध्ये पाकिस्तानचे दोन भाग करणं हा विचार पहिल्या टप्प्यात होता. ३० जानेवारी १९७१ मध्ये काश्मीरी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण करून लाहौरला घेऊन जाणं टर्निंग पॉईंट ठरलं. भारताने ओवरफ्लाइट सुविधा थांबवली. त्यामुळे पूर्व पाकिस्तानमध्ये हत्यारं घेऊन जाण्यास रोखलं गेले. कोलंबोहून उड्डाण करणं कठीण आणि खर्चिक होतं. रहमान निवडणुकीत जिंकूनही पंतप्रधान बनू दिलं नाही. तेव्हा रहमान यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली. भारताने एप्रिल १९७१ मध्ये युद्धात दखल देण्यास सुरुवात केली.७ मार्चला इंदिरा गांधी यांनी बहुमताने केंद्रात सत्ता मिळवली. त्यामुळे अनेक गोष्टी बदलल्या. भारत की दुर्गा असं इंदिरा गांधी यांना म्हटलं गेले. १९७१ चं युद्धात सर्व प्रकारच्या सिद्धांतांचे पालन झाले असं अनिल कुमार चावला म्हणाले.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेश