शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

Piyush Goyal : "काही फायद्यांसाठी काँग्रेस आपलीच सरकारे अस्थिर करतेय आणि राष्ट्रीय सुरक्षेशीही तडजोड"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 14:56 IST

Piyush Goyal And Congress : काँग्रेस नेते राहुल गांधी ट्विटरद्वारे सतत केंद्र सरकारवर टीका करत असतात. यावरून गोयल यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला. 

नवी दिल्ली - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला आहे. काही फायद्यासाठी राष्ट्रीय हितसंबंधांशी तडजोड केल्याचा आरोप गोयल यांनी केला. पीयूष गोयल यांनी "काही लोकांच्या राजकीय फायद्यासाठी काँग्रेस राष्ट्रीय हितांशी तडजोड करत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपासाठी राष्ट्रीय सुरक्षा सर्वात आधी आहे" असं म्हटलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी ट्विटरद्वारे सतत केंद्र सरकारवर टीका करत असतात. यावरून गोयल यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला. 

"काँग्रेस पक्ष राहुल गांधींना गांभीर्याने कधीच घेत नाही. आपल्याच सरकारांना काँग्रेस नेतृत्व रोज अस्थिर करत आहे. काँग्रेस नेतृत्व राष्ट्रीय चिंतांपासून तुटले आहे. राजकीय निर्णय घेताना राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करेल" अशी अपेक्षा पीयूष गोयल यांनी व्यक्त केली आहे. पंजाब काँग्रेसमध्ये जे काही घडतंय त्यावरून मी खूप चिंतेत आहे. कारण राष्ट्रीय सुरक्षा आमच्यासाठी प्रथम आहे. सर्व प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि शेवटी आपण येतो. आम्ही या तत्त्वावर काम करतो. पंतप्रधान मोदींच सरकार आणि भाजप याच विचाराने काम करतं, असंही गोयल यांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"राहुल गांधी स्वत: काँग्रेसला बुडवताहेत"

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाबमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "राहुल गांधी स्वत: काँग्रेसला बुडवताहेत" असं म्हणत शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी राहुल (Congress Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "त्यामुळे ते असेपर्यंत आम्हाला काहीही करण्याची गरज नाही" असं मत चौहान यांनी व्यक्त केलं. तसेच "पंजाबमध्ये चांगले अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होते, मात्र नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नादात पंजाबमधील सरकार संपवलं" असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. 

"राहुल गांधी असेपर्यंत आम्हाला काही करण्याची गरजच नाही"

चौहान यांच्या या विधानाचा एक व्हिडीओ देखील ट्विटरवर शेअर करण्यात आला असून तो जोरदार व्हायरल होत आहे. शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. "सध्या राहुल गांधी स्वतः काँग्रेसला बुडवण्याचं काम करत आहेत. पंजाबमध्ये स्थापन झालेलं सरकार त्यांनी संपवलं. अमरिंदर सिंग चांगले मुख्यमंत्री होते. नवज्योत सिंग सिद्धूच्या नादात अमरिंदर सिंग यांना हटवलं आणि आता सिद्धू पण पळाले. त्यामुळे आता राहुल गांधी असेपर्यंत आम्हाला काही करण्याची गरजच नाही" असं चौहान यांनी म्हटलं आहे.

 

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलcongressकाँग्रेसPoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधी