शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या राज्यसभेतील खासदारांवर पीयूष गोयल भडकले, खडेबोल सुनावले, नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 15:32 IST

Piyush Goyal : राज्यसभेतील सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री पीयू। गोयल यांनी भाजपाच्या राज्यसभेतील भाजपाच्या खासदारांना फटकार लगावली.

मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि दोन महिलांची विवस्त्रावस्थेत धिंड काढण्यात आल्याची समोर आलेली घटना यामुळे संसदेच्या पावसाठी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेले आहेत. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित केले. तसेच सर्व खासदारांना संसदेच्या कामकाजात सक्रिकय सहभागी होण्याची सूचना दिली. यावेळी राज्यसभेतील सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री पीयू। गोयल यांनी भाजपाच्या राज्यसभेतील भाजपाच्या खासदारांना फटकार लगावली.

पीयूष गोयल यांनी भाजपाच्या राज्यसभेतील खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याबाबत ताकीद दिली. ज्या खासदारांना भोजन करायला जायचं असेल तर त्यांनी विश्रांतीच्या काळात जावं. सभागृह सुरू असताना जाऊ नये. अनुपस्थित राहण्यासाठी कुठलाही बहाणा चालणार नाही. या हंगामात आतापर्यंत सुमारे २३ खासदार वेगवेगळ्या प्रसंगी अनुपस्थित राहिले आहेत.

मणिपूरमधील हिंसाचारावर विरोधी पक्षांकडून मंगळवारीही राज्यसभेमध्ये आक्रमक भूमिका घेण्यात आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून सरकारने मणिपूरसह राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्ये महिलांविरोधात होत असलेल्या गुन्ह्यांवरही चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली. प्रश्नोत्तराच्या तासावेळी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मणिपूरमधील परिस्थितीचा उल्लेख करत या संदर्भात सुमारे ५० सदस्यांनी नोटिस दिली आहे. विरोधी पक्ष गेल्या चार दिवसांपासून याबाबत चर्चेची मागणी करत आहेत.

मल्लिकार्जुन खर्गे यांना प्रत्युत्तर देताना सभागृहातील नेते पीयूष गोयल यांनी सांगितले की, कुठल्याही महिलेवर अत्याचार होत असतील तर ते दुर्दैवी आहे. सरकार या विषयाबरोबरच छत्तीसगड, राजस्थान, पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये महिलांविरोधात होत असलेल्या गुन्ह्यांची चर्चा करू इच्छिते, असे सांगितले. यावेळी पीयूष गोयल यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधताना सांगितले की, सरकार चर्चेसाठी तयार आहे. तसेच गृहमंत्री स्थिती स्पष्ट करतील. मात्र विरोधी पक्ष चर्चा करत नाही आहे. कारण त्यांना आपलं अपयश लपवायचं आहे, असे पीयूष गोयल म्हणाले.  

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा