शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

आधी कर्नाटक, आता केरळ; मुख्यमंत्र्यांचे राजधानी दिल्लीत केंद्राविरोधात आंदोलन, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 15:08 IST

Pinarayi Vijayan Protest in Delhi: यावेळी सीएम अरविंद केजरीवाल, भगवंत मान, फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी नेते उपस्थित होते.

Pinarayi Vijayan Protest in Delhi: दक्षिणेत राज्ये अनेकदा केंद्र सरकारवर अन्याय केल्याचा आरोप करत असतात. आता परत एकदा दक्षिण vs उत्तर वाद सुरू झाला आहे. कर्नाटकानंतर आता केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर जाऊन निदर्शने केली असून, केंद्र सरकार निधी वाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी सीएम अरविंद केजरीवाल, भगवंत मान, फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी नेते उपस्थित होते.

विशेष म्हणजे, दोन दिवसांत दक्षिण भारतातील दोन मोठ्या राज्यांचे प्रमुख राजधानी दिल्लीत आंदोलनासाठी आले आहेत. बुधवारी (7 फेब्रुवारी) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपल्या सर्व आमदार, खासदार आणि विधानपरिषद सदस्यांसह निषेध करण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. आता गुरुवारी (8 फेब्रुवारी) केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आपल्या आमदार आणि खासदारांसह दिल्लीत आहेत. दोन्ही राज्यांच्या आंदोलनाचे कारण एकच आहे. केंद्र सरकार दक्षिण भारतातील राज्यांशी आर्थिक भेदभाव करत असल्याचा आरोप दोन्ही राज्यांच्या प्रमुखांनी केला.

केंद्राविरोधात निषेध नोदवण्यासाठी बुधवारी कर्नाटक तर गुरुवारी केरळचे सत्ताधारी आमदार एकत्र आले. केरळमध्ये डाव्यांचे सरकार असून, आहे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी लोकांना केंद्राविरोधातील त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर पोहोचण्याचे आवाहन केले आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार अनुदान नाकारुन राज्याच्या आर्थिक लाभात कपात करत असल्याचा आरोप यावेळी केला. तसेच, आंदोलनाचा उद्देश केवळ केरळच नाही तर सर्व राज्यांच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करणे आहे, असेही ते म्हणाले. 

दक्षिणेतील तीन राज्यांचा केंद्राला विरोधकर्नाटकानंतर आता केरळचे मुख्यमंत्री विरोध करत असून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी त्यांना पाठिंबा देणारे पत्र लिहिले आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकार निधी वाटपात भेदभाव कर असून, राज्य सरकारांचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडच्या काळात परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. याबद्दल मुख्यमंत्री विजयन यांनी आभार व्यक्त केले आहेत.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKeralaकेरळCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी