शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

48 रुपयांपेक्षा महाग पेट्रोल म्हणजे जनतेचं शोषण; सुब्रमण्यम स्वामींकडून सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 09:25 IST

इंधन दरवाढीवरुन स्वामींची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहेत. याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. यावरुन आता भाजपाचे राज्यसभेतील सुब्रमण्यम स्वामी यांनी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. पेट्रोलचे दर जास्तीत जास्त 48 रुपये प्रति लिटर असायला हवेत. सरकार लोकांकडून यापेक्षा जास्त पैसे लोकांकडून वसूल करत असेल, तर ते शोषण आहे, असं स्वामी यांनी म्हटलं. आज मुंबईत पेट्रोलचा दर 86.72 रुपये प्रति लिटर इतका आहे. कालच्या तुलनेत पेट्रोलच्या दरात 16 पैशांची वाढ झाली आहे. देशभरात पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढतच आहेत. त्यामुळे आता भाजीपाल्यासह सर्वच वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. यावरुन सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. पेट्रोलचे दर 48 रुपयांपेक्षा अधिक वाढवले जाऊ नयेत. सरकार यापेक्षा जास्त किंमत जनतेकडून वसूल करत असेल, तर ती सर्वसामान्यांची लूट आहे, अशा शब्दांमध्ये स्वामी यांनी इंधन दरवाढीवरुन सरकारचा समाचार घेतला. पेट्रोलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. राज्यात सर्वात जास्त महाग पेट्रोल अमरावतीत मिळत आहे. अमरावतीत सोमवारी (3 सप्टेंबर) रोजी पेट्रोलचा प्रतिलिटर दर 87.97 तर डिझेलचा प्रतिलिटर दर 77.09 होता. त्यानंतर आज त्यामध्ये वाढ होऊन पेट्रोलचा प्रतिलिटर दर 88.14 तर डिझेलचा प्रतिलिटर दर 77.29 झाला आहे. सलग 10 दिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरू आहे. खाद्यान्न, धान्य, भाजीपाला यांची वाहतूक डिझेलच्या वाहनानं होत असते. ही वाहतूक करणाऱ्या मालवाहतूकदारांनी डिझेल 68 रुपये प्रति लिटरवर असताना मालभाड्याचा दर निश्चित केला होता. डिझेल 74 रुपये होईपर्यंत आम्ही सहन करू, पण त्यानंतर भाडेदरात वाढीचा विचार करावा लागेल, असे मालवाहतूकदारांनी ‘लोकमत’ला सांगितलं आहे. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीNarendra Modiनरेंद्र मोदीPetrolपेट्रोलDieselडिझेल