शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पोलीस चकमकींविरोधात न्यायालयांमध्ये याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 03:36 IST

सोमवारी सुनावणी; मानवाधिकार आयोगाने केली पाहणी

नवी दिल्ली : हैदराबादमधील बलात्कार प्रकरणी संशयावरून अटक करण्यात आलेले चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाल्याच्या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका शनिवारी सर्वोच्च न्यायालयात आली असून, त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. पोलिसांच्या कारवाईला न्यायालयात आव्हान दिल्याने त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पथकही आज हैदराबादमधील घटनास्थळी गेले होते. तसेच त्या पथकाने पोलिसांकडून काही माहिती घेतली आहे. त्याआधारे आयोग आपला अहवाल देईल. या आयोगाने आधीच पोलिसांच्या कारवाईला आक्षेत घेतला होता. राष्ट्रीय महिला आयोगानेही संशयीत वा आरोपींना शिक्षा देण्याचा अधिकार पोलिसांचा नसून, न्यायालयाचा आहे, असेच म्हटले आहे. महिला आयोगानेही पोलिसांकडून चकमकींची माहिती मागवून घेतली आहे.

चारही संशयीतांना पोलीस चकमकीत ठार करण्याची पोलिसांची कृती सर्वोच्च न्यायालयाने पोलीस चकमकींसंदर्भात २0१४ साली ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात आहे, असे अ‍ॅड सी. एस.मणी व अ‍ॅड. प्रदीपकुमार यादव यांनी याचिकेत म्हटले आहे. याखेरीज या चकमकींचे समर्थन करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी याचिका अ‍ॅड. मनोहरलाल शर्मा यांनी केली आहे.

तसेच तेलंगणा उच्च न्यायालयातही हे प्रकरण गेले आहे. मृत संशयीतांच्या पोस्ट मॉर्टेमचे चित्रिकरण सोमवारी आपल्याकडे सादर करावे आणि त्यांच्या मृतदेहांवर १0 डिसेंबर रात्री आठ वाजेपर्यंत अंत्यसंस्कार करू नये, असा आदेश न्यायालयाने या याचिकेच्या निमित्ताने दिला आहे.

बदल्याची कृती अयोग्यच : न्या. बोबडे

हैदराबादचे प्रकरण ताजे असतानाच, बदला घेण्याच्या भावनेने केलेली कृती म्हणजे न्याय नव्हे, असे स्पष्ट प्रतिपादन सरन्यायाधीशशरद बोबडे यांनी शनिवारी केले. या वा कोणत्याची घटनेचा उल्लेख न करता सरन्यायाधीश म्हणाले की न्यायामध्ये बदला घेण्याची भावनाअसली तर तो न्याय राहतच नाही. न्याय कधीच लगेचच्या लगेच वा घाईघाईत होत नसतो. त्यात घटनेची चौकशी व्हावी लागते. बदल्याच्या भावनेने केलेली कृती ही कधीच न्याय ठरू शकत नाही.

टॅग्स :PoliceपोलिसSupreme Courtसर्वोच्च न्यायालयhyderabad caseहैदराबाद प्रकरण