शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'हा' व्यक्ती शेतकऱ्यांच्या जेवणावर दररोज खर्च करायचा 4 लाख रुपये, वर्षभर चालवला लंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 17:44 IST

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी वर्षभराहून अधिक काळ आंदोलन करत होते. आंदोलनादरम्यान त्यांच्यासाठी लंगरची सोय करण्यात आली होती.

नवी दिल्ली :दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता मागे घेण्यात आले आहे. आंदोलक शेतकरी आपापल्या घराकडेही निघाले आहेत. अशा परिस्थितीत सिंघू सीमेवर शेतकऱ्यांसाठी वर्षभर लंगर चालवणारा हॉटेलचा मालक सध्या चर्चेत आहे. आंदोलनादरम्यान त्यांनी हजारो शेतकऱ्यांना मोफत जेवण दिले. आंदोलनाच्या शेवटी संयुक्त किसान मोर्चाने (SKM) पत्रकार परिषद घेऊन त्यांचे आभारही मानले.

रेस्टॉरंटचे नाव गोल्डन हट आहे. गोल्डन हटचे मालक राणा रामपाल सिंग यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मी खूप आनंदी आहे. आनंदाचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. शेतकरी हे माझे कुटुंब आहे. प्रत्येक शेतकरी त्याच्या घरी जाईपर्यंत हा लंगर चालेल. राणा रामपाल सिंह दररोज सुमारे 4 लाख रुपये खर्च करुन शेतकऱ्यांसाठी लंगर चालवत होते. शेतकरी आंदोलनादरम्यान रेस्टॉरंट इतरांसाठी बंद ठेवण्यात आले होते. आता आंदोलन संपले आहे, त्यामुळे ते पुन्हा आपले रेस्टॉरंट उघडण्याच्या तयारीत आहे.

शेतकरी आंदोलन मागेगेल्या एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत होते. आंदोलन मागे घेतल्याच्या पहिल्याच दिवशी बहुतांश शेतकरी दिल्लीच्या सीमा सोडून आपापल्या घरी परतले आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कृषीविषयक कायदे रद्द करण्यासाठी आवश्यक विधेयक केंद्र सरकार आणेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी केली होती. त्यानुसार, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 29 नोव्हेंबर रोजी लोकसभा आणि राज्यसभेत विधेयक मांडण्यात आले आणि ते मंजुर झाले केले.

 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीdelhiदिल्ली