शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
6
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
7
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
8
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
9
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
10
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
11
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
12
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
13
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
14
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
15
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
16
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
17
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
18
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
19
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
20
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...

'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:11 IST

१९६२ च्या भारत-चीन युद्धात भारतीय हवाई दलाचा वापर केला असता तर चिनी हल्ल्याला रोखण्यास मदत झाली असती, असे विधान संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केले. लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना त्यांनी हे विधान केले.

१९६२ च्या भारत आणि चीनमधील युद्धात जर भारतीय हवाई दलाचा वापर झाला असता, तर चीनचा हल्ला मोठ्या प्रमाणात रोखता आला असता, असे विधान संरक्षण प्रमुख (CDS) जनरल अनिल चौहान यांनी केले. ते लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते.

सीडीएस म्हणाले, त्यावेळी हवाई दलाचा वापर आक्रमक मानला जात होता, पण आता परिस्थिती बदलली आहे, आता आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहिले आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले

पुण्यात लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात यांच्या सुधारित आत्मचरित्र "रेव्हिल टू रिट्रीट" च्या प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्यात व्हिडिओ संदेशात चौहान यांनी हे विधान केले.

"१९६२ मध्ये स्वीकारलेली फॉरवर्ड पॉलिसी लडाख आणि ईशान्य फ्रंटियर एजन्सीवर एकसमानपणे लागू करणे चुकीचे आहे. या दोन्ही प्रदेशांचा संघर्षाचा इतिहास आणि भौगोलिक स्थान पूर्णपणे भिन्न होते", असेही जनरल चौहान म्हणाले.

फॉरवर्ड पॉलिसीची चूक

"फॉरवर्ड पॉलिसीच्या अंमलबजावणीत एकरूपता अपुरी होती. चीनने लडाखमध्ये आधीच भारतीय भूभागावर कब्जा केला होता, तर नेफामध्ये भारताचा जोरदार दावा होता. दोन्ही प्रदेशांसाठी समान धोरण स्वीकारणे ही एक धोरणात्मक चूक होती. भू-राजकीय आणि सुरक्षा परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे, यामुळे आजच्या संदर्भात त्या वेळी घेतलेल्या निर्णयांचे मूल्यांकन करणे कठीण झाले आहे, असे स्पष्टीकरण जनरल चौहान यांनी केले. 

लेफ्टनंट जनरल थोरात यांनी हवाई दलाचा वापर करण्याचा विचार केला होता, पण तत्कालीन सरकारने ते अधिकृत केले नव्हते. हवाई दलाच्या तैनातीने फक्त चिनी आक्रमण कमी झाले नसते तर लष्कराला तयारीसाठी अधिक वेळही मिळाला असता', असंही चौहान म्हणाले.

'त्यावेळी हवाई दलाचा वापर आक्रमक मानला जात होता'

१९६२ मध्ये हवाई दलाचा वापर न करणे ही एक मोठी संधी गमावली होती. कमी वेळ, अनुकूल भूगोल आणि मोठ्या पेलोड क्षमतेमुळे, हवाई दल चिनी सैन्यावर मात करू शकले असते. त्यावेळी ते आक्रमक मानले जात होते, पण मे २०२५ मध्ये झालेल्या ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले की हवाई दलाचा वापर आता सामान्य रणनीतीचा भाग आहे. या ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी हवाई शक्तीचा वापर केला.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दल