शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:11 IST

१९६२ च्या भारत-चीन युद्धात भारतीय हवाई दलाचा वापर केला असता तर चिनी हल्ल्याला रोखण्यास मदत झाली असती, असे विधान संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केले. लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना त्यांनी हे विधान केले.

१९६२ च्या भारत आणि चीनमधील युद्धात जर भारतीय हवाई दलाचा वापर झाला असता, तर चीनचा हल्ला मोठ्या प्रमाणात रोखता आला असता, असे विधान संरक्षण प्रमुख (CDS) जनरल अनिल चौहान यांनी केले. ते लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते.

सीडीएस म्हणाले, त्यावेळी हवाई दलाचा वापर आक्रमक मानला जात होता, पण आता परिस्थिती बदलली आहे, आता आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहिले आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले

पुण्यात लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात यांच्या सुधारित आत्मचरित्र "रेव्हिल टू रिट्रीट" च्या प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्यात व्हिडिओ संदेशात चौहान यांनी हे विधान केले.

"१९६२ मध्ये स्वीकारलेली फॉरवर्ड पॉलिसी लडाख आणि ईशान्य फ्रंटियर एजन्सीवर एकसमानपणे लागू करणे चुकीचे आहे. या दोन्ही प्रदेशांचा संघर्षाचा इतिहास आणि भौगोलिक स्थान पूर्णपणे भिन्न होते", असेही जनरल चौहान म्हणाले.

फॉरवर्ड पॉलिसीची चूक

"फॉरवर्ड पॉलिसीच्या अंमलबजावणीत एकरूपता अपुरी होती. चीनने लडाखमध्ये आधीच भारतीय भूभागावर कब्जा केला होता, तर नेफामध्ये भारताचा जोरदार दावा होता. दोन्ही प्रदेशांसाठी समान धोरण स्वीकारणे ही एक धोरणात्मक चूक होती. भू-राजकीय आणि सुरक्षा परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे, यामुळे आजच्या संदर्भात त्या वेळी घेतलेल्या निर्णयांचे मूल्यांकन करणे कठीण झाले आहे, असे स्पष्टीकरण जनरल चौहान यांनी केले. 

लेफ्टनंट जनरल थोरात यांनी हवाई दलाचा वापर करण्याचा विचार केला होता, पण तत्कालीन सरकारने ते अधिकृत केले नव्हते. हवाई दलाच्या तैनातीने फक्त चिनी आक्रमण कमी झाले नसते तर लष्कराला तयारीसाठी अधिक वेळही मिळाला असता', असंही चौहान म्हणाले.

'त्यावेळी हवाई दलाचा वापर आक्रमक मानला जात होता'

१९६२ मध्ये हवाई दलाचा वापर न करणे ही एक मोठी संधी गमावली होती. कमी वेळ, अनुकूल भूगोल आणि मोठ्या पेलोड क्षमतेमुळे, हवाई दल चिनी सैन्यावर मात करू शकले असते. त्यावेळी ते आक्रमक मानले जात होते, पण मे २०२५ मध्ये झालेल्या ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले की हवाई दलाचा वापर आता सामान्य रणनीतीचा भाग आहे. या ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी हवाई शक्तीचा वापर केला.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दल