शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राजकीय नेत्यांना बँकांमध्ये सीईओ, एमडीचे पद नाही, अर्थशास्त्राची पदवी अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 09:50 IST

आरबीआयने नियमांमध्ये केले बदल

मुंबई : खासगी आणि सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक, सीईओ तसेच पूर्णकालीन संचालकांच्या नियुक्यांच्या नियमांमध्ये सुसंगती राहावी, यासाठी आरबीआयने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या पदांवरील नियुक्त्यांचा कार्यकाळ एका वेळी पाच वर्षांपेक्षा अधिक राहणार नाही. तसेच राजकारण्यांची या पदांवर नियुक्ती करण्यास आरबीआयने प्रतिबंध घातला आहे. तशी अधिसूचना आरबीआयने काढली आहे.

या निर्णयामुळे सहकारी बँकांवर राजकारणी तसेच इतर नेत्यांच्या नियुक्त्या करून ठेवीदारांच्या गुंतवणुकीवर आता नागरी सहकारी बँकांना डल्ला मारता येणार नाही. आरबीआयच्या अधिसूचनेनुसार खासगी आणि नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि पूर्णकालीन संचालकांची पहिली नियुक्ती किमान ३ वर्षांसाठी राहील. त्यांची पुनर्नियुक्ती करता येईल. त्यांच्या कामाचा मंडळातर्फे दरवर्षी आढावा घेण्यात येईल. मात्र, एकाच व्यक्तीला या पदांवर १५ वर्षांहून अधिक काळ राहता येणार नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 

सहकारी बँकांनी या पदावर नियुक्त करताना काही निकषांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. पात्र व्यक्तीचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी आणि ७० वर्षांपेक्षा अधिक नकाे. तसेच  संबंधित व्यक्ती खासदार, आमदार किंवा नगरसेवक नसावा, असे आरबीआयने म्हटले आहे. तसेच या पदासाठी स्नातकोत्तर पदवीधारक, वित्तीय विषयातील, सनदी वा व्यय लेखापाल किंवा आर्थिक विषयातील व्यवस्थापन पदवीधारक, बँक अथवा सहकारी व्यवसाय व्यवस्थापनातील पदविकाधारक पात्र असतील. तसेच बँकिंग क्षेत्रात उच्च पदावर किमान ८ वर्षे काम करण्याचा अनुभवही पाठीशी असणे आवश्यक राहणार आहे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रMLAआमदार