शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

जनतेचे प्रश्न, चुकीच्या धोरणांवरून मोदी सरकारला धरणार धारेवर- मल्लिकार्जुन खरगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 06:53 IST

विरोधासाठी विरोध करणार नाही

नवी दिल्ली : आम्ही नरेंद्र मोदी सरकारला विरोधासाठी विरोध करणार नाही. मात्र सामान्य जनतेला भेडसावणारे प्रश्न व चुकीच्या धोरणांबाबत मोदी सरकारला धारेवर धरणारच असे राज्यसभेतील नवे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. 

गुलाम नबी आझाद यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर या सभागृहात विरोधी पक्षनेतेपदी खरगे यांची या आठवड्यात निवड झाली. खरगे म्हणाले की, शेतकऱ्यांवर अन्याय करणारे नवे तीन कृषी कायदे मोदी सरकारने त्वरित रद्द करावेत. त्यानंतर शेतीतील सुधारणांकरिता केंद्र सरकारने नवीन प्रस्ताव सादर करावेत. त्या प्रस्तावांची संसदीय स्थायी समितीकडून छाननी व्हायला हवी.  ते म्हणाले की, गरिबांचे प्रश्न संसदेत अग्रक्रमाने मांडा, असा आदेश काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व काँग्रेस नेते राहुल गांधी मला दिला आहे. विविध प्रश्न संसदेत उपस्थित करून प्रसिद्धी मिळवायची आम्हाला हौस नाही.  

फूट पाडण्याचे प्रयत्न

मल्लिकार्जून खरगे म्हणाले, नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे मोदी सरकारने ऐकून घ्यावे. या आंदोलक शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. या आंदोलनात फूट पाडण्यासाठी मोदी सरकार त्याच्या हातातील साऱ्या यंत्रणांचा वापर करत आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा