शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

... तर लोक शेतीपासून दूर पळतील, उपराष्ट्रपती नायडूंचा अर्थमंत्र्यांना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 09:15 IST

नायडू यांच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी माजी पंतप्रधान मनमोहनसिंह, एच.डी.देवेगौडा, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, अर्थमंत्री अरुण जेटलींसह अनेक उच्चपदस्थ हजर होते. याप्रसंगी बोलताना उपराष्ट्रपती नायडू यांनी शेती

 नवी दिल्ली - उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नायडू यांनी अर्थमंत्र्यांना चिमटा घेतला. वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नायडू यांच्या 'मूव्हींग ऑन मूव्हींग फॉरवर्ड अ इअर इन अ ऑफिस' या पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात नायडू यांनी शेती क्षेत्राविषयी मत मांडताना अर्थमंत्री अरूण जेटलींना लक्ष्य केले. तसेच शेतीविषयक योग्य धोरण न राबविल्यास शेतकरी शेतीपासून दूर पळतील, असे भाकितही त्यांनी केले. 

नायडू यांच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी माजी पंतप्रधान मनमोहनसिंह, एच.डी.देवेगौडा, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, अर्थमंत्री अरुण जेटलींसह अनेक उच्चपदस्थ हजर होते. याप्रसंगी बोलताना उपराष्ट्रपती नायडू यांनी शेती क्षेत्रातील विकासाबद्दल नाराजी दर्शवली. कृषी क्षेत्राकडे अधिक प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे. अर्थमंत्रीदेखील येथे आहेत. कदाचित, त्यांना माझे हे वक्तव्य आवडणार नाही. कारण, त्यांना सर्वांचीच काळजी घ्यावी लागते. पण, आगामी  काळात कृषी क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात लक्ष घालावे लागणार आहे, अन्यथा लोक शेती करायचे सोडून देतील, अशा शब्दात नायडू यांनी भीती व्यक्त केली.

तसेच संसदेतील कार्यप्रणालीबाबतही मी थोडासा नाराज आहे. कारण, संसदेतही पाहिजे तितके, यशस्वीपणे काम होत नाही. इतर अनेक क्षेत्रात आपण विकास करत आहोत. विश्व बँक, वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्याकडून जे रेटींग मिळत आहे, ते उत्तम आहे. देशाच्या आर्थिक विकासाबाबत जे काही होत आहे, ते अतिशय चांगल आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची बाब आहे. मात्र, शेतीविषयक धोरणांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा शेतीपासून शेतकरी दूर पळतील अशी भीती नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर व्यक्त केली. दरम्यान, नायडूजी हे हाडाचे शेतकरी आहेत. त्यामुळेच मी ग्रामीण विकास मंत्री होऊ इच्छितो, असे नायडू्ंनी एकदा म्हटले होते, अशी आठवण पंतप्रधान मोदींनी करून दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूArun Jaitleyअरूण जेटली