शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

... तर लोक शेतीपासून दूर पळतील, उपराष्ट्रपती नायडूंचा अर्थमंत्र्यांना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 09:15 IST

नायडू यांच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी माजी पंतप्रधान मनमोहनसिंह, एच.डी.देवेगौडा, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, अर्थमंत्री अरुण जेटलींसह अनेक उच्चपदस्थ हजर होते. याप्रसंगी बोलताना उपराष्ट्रपती नायडू यांनी शेती

 नवी दिल्ली - उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नायडू यांनी अर्थमंत्र्यांना चिमटा घेतला. वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नायडू यांच्या 'मूव्हींग ऑन मूव्हींग फॉरवर्ड अ इअर इन अ ऑफिस' या पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात नायडू यांनी शेती क्षेत्राविषयी मत मांडताना अर्थमंत्री अरूण जेटलींना लक्ष्य केले. तसेच शेतीविषयक योग्य धोरण न राबविल्यास शेतकरी शेतीपासून दूर पळतील, असे भाकितही त्यांनी केले. 

नायडू यांच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी माजी पंतप्रधान मनमोहनसिंह, एच.डी.देवेगौडा, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, अर्थमंत्री अरुण जेटलींसह अनेक उच्चपदस्थ हजर होते. याप्रसंगी बोलताना उपराष्ट्रपती नायडू यांनी शेती क्षेत्रातील विकासाबद्दल नाराजी दर्शवली. कृषी क्षेत्राकडे अधिक प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे. अर्थमंत्रीदेखील येथे आहेत. कदाचित, त्यांना माझे हे वक्तव्य आवडणार नाही. कारण, त्यांना सर्वांचीच काळजी घ्यावी लागते. पण, आगामी  काळात कृषी क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात लक्ष घालावे लागणार आहे, अन्यथा लोक शेती करायचे सोडून देतील, अशा शब्दात नायडू यांनी भीती व्यक्त केली.

तसेच संसदेतील कार्यप्रणालीबाबतही मी थोडासा नाराज आहे. कारण, संसदेतही पाहिजे तितके, यशस्वीपणे काम होत नाही. इतर अनेक क्षेत्रात आपण विकास करत आहोत. विश्व बँक, वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्याकडून जे रेटींग मिळत आहे, ते उत्तम आहे. देशाच्या आर्थिक विकासाबाबत जे काही होत आहे, ते अतिशय चांगल आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची बाब आहे. मात्र, शेतीविषयक धोरणांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा शेतीपासून शेतकरी दूर पळतील अशी भीती नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर व्यक्त केली. दरम्यान, नायडूजी हे हाडाचे शेतकरी आहेत. त्यामुळेच मी ग्रामीण विकास मंत्री होऊ इच्छितो, असे नायडू्ंनी एकदा म्हटले होते, अशी आठवण पंतप्रधान मोदींनी करून दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूArun Jaitleyअरूण जेटली