लोकांनी निवडले तर पुन्हा मुख्यमंत्री होणार - नितिश कुमार
By Admin | Updated: May 19, 2014 16:51 IST2014-05-19T16:51:41+5:302014-05-19T16:51:41+5:30
लोकांचा कौल स्वीकारत आपण राजीनामा दिला असून लवकरच नवा नेता निवडण्यात येईल असे सांगणा-या नितिशकुमारांनी आपण पुन्हा निवडणुका लढवू आणि लोकांनी कौल दिला तर पुन्हा मुख्यमंत्री बनू असे सोमवारी सांगितले.

लोकांनी निवडले तर पुन्हा मुख्यमंत्री होणार - नितिश कुमार
ऑनलाइन टीम
पाटणा, दि. १९ - लोकांचा कौल स्वीकारत आपण राजीनामा दिला असून लवकरच नवा नेता निवडण्यात येईल असे सांगणा-या नितिशकुमारांनी आपण पुन्हा निवडणुका लढवू आणि लोकांनी कौल दिला तर पुन्हा मुख्यमंत्री बनू असे सोमवारी सांगितले.
लोकसभा निवडणुकीतला जनता दलाचा पराभव हा भाजपाच्या विखारी व सांप्रदायिक दुही पसरवणा-या विचारांमुळे झाला असल्याचा आरोप करत नितिशकुमारांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्याचे सांगितले. अर्थात, जनता भाजपाच्या प्रचाराला भुलली असल्याचे सांगत, पुढील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनता दलालाच पुन्हा यश मिळेल असा दावाही त्यांनी केला.
भाजपाने जनता दलाचे काही आमदार फुटले असल्याचा कांगावा करत एकूण ५० आमदार सोबत असल्याचा दावा केल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र जनता दल अभेद्य असून आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री शपथग्रहण करेल असे ते म्हणाले. स्वत: नितीशकुमार मुख्यमंत्री बनणार नसले तरी नेता निवडीचे अधिकार पक्षाने त्यांनाच दिले आहेत.