शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
3
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
5
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
6
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
7
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
8
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
9
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
10
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
11
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
12
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
13
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
15
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
16
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
17
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
18
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
19
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
20
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?

'जे लोक चारा खातात, ते कधीच परिस्थिती बदलू शकत नाहीत'; पंतप्रधान मोदींचा लालू प्रसाद यादवांवर 'वार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 16:57 IST

बिहार दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर नाव न घेता टीकेचे बाण डागले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा चारा घोटाळ्यावरून लालू प्रसाद यादव यांच्यावर टीकास्त्र डागले. भागलपूर येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १९वा हफ्ता जमा करण्यात आला. यावेळी संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी नितीश कुमार यांचा लाडका मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताचे कृषी निर्यात वेगाने वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला आता जास्त किंमत मिळत आहे. आता बिहारला मखाना उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. भागलपूरच्या विणकरांना आम्ही सुविधा देऊ. कापड उद्योगही आम्ही पुढे नेत आहोत. रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

पीएम मोदींची लालू प्रसाद यादवांवर टीका

लालू प्रसाद यादव यांचं नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "काही लोक तर जनावरांचा चाराही खाऊन टाकतात. जे चारा खातात, ते कधीच परिस्थिती बदलू शकत नाहीत. एनडीए शेतकऱ्यांच्या विकासासाठी वचनबद्ध आहे. मी नेहमी असे मानतो की, गरीब, अन्नदाता, तरुण आणि महिला हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत", असे मोदी म्हणाले. 

"पूर्वी छोट्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता. एनडीएचे सरकार नसते तर शेतकऱ्यांना सन्मान निधीही मिळाला नसता. एनडीए सरकारने शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली आहे. आम्ही नुकसान होणार नाही, यासाठी उपाय योजना केल्या आहेत. काँग्रेसला शेतकऱ्यांचं महत्त्व नाही. त्याच्या सरकारमध्ये मच्छिमारांनाही लाभ मिळत नव्हता", अशी टीका मोदींनी केली. 

मी सुद्धा वर्षातील ३०० दिवस मखाना खातो -मोदी 

"आता मखाना बोर्ड लवकरच स्थापित केले जाणार आहे. त्यामुळे बिहारमधील शेतकऱ्यांना लाभ होईल. वर्षातील ३०० दिवस मी सुद्धा मखाना खातो. आता बिहारमधील मखानाला पुढे नेण्याची वेळ आहे. बिहारचा प्राचीन गौरव आम्ही परत आणू. पूर्वोदयाकडूनच विकसित भारताच्या उदय होईल", असेही मोदी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBJPभाजपा