शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देशातील जनतेने या निवडणुकीत खोटे, द्वेष व अपप्रचाराला नाकारले: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 10:06 IST

राहुल गांधी यांनी शनिवारी मतदान केल्यानंतर व्यक्त केल्या भावना

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी मतदान केल्यानंतर सांगितले की, देशातील जनतेने या निवडणुकीत खोटे, द्वेष व अपप्रचाराला नाकारले आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत मतदान केले. मतदानानंतर आई सोनिया यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करताना राहुल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात ते म्हणाले की, देशवासीयांनो, मतदानाच्या पहिल्या पाच टप्प्यांत तुम्ही खोटे, द्वेष आणि अपप्रचार नाकारला आहे, तसेच तुमच्या जीवनाशी संबंधित समस्यांना प्राधान्य दिले आहे. आज मतदानाचा सहावा टप्पा आहे आणि तुमचे प्रत्येक मत हे सुनिश्चित करेल की, ३० लाख सरकारी पदांवर भरती होईल. गरीब कुटुंबातील महिलांच्या खात्यात दरमहा ८,५०० रुपये येणे सुरू होईल. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या पिकांवर योग्य एमएसपी मिळायला हवा.

'ते' संविधान बदलतील

निवडणुकीत भाजप जिंकला, तर ते संविधान बदलतील, अशी भीती राहुल गांधी यांनी येथे प्रचारसभेत व्यक्त केली. अमृतसरचे उमेदवार गुरजितसिंग औजला यांच्या समर्थनार्थ सभेला संबोधित करताना ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, ही निवडणूक दोन विचारसरणींमधील लढाई आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४