शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

मोदींच्या ‘मित्रों’ची लोकांना आता धास्ती!, काँग्रेसचा प्रतिहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 3:20 AM

हिमाचल प्रदेश निवडणूक प्रचारात तोंडसुख घेणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने रविवारी प्रतिहल्ला चढविला आणि मोदींच्या भाषणांतील ‘मित्रों’ या पालुपदाची लोकांनी आता धास्ती घेतली असल्याचा टोला लगावला.

धर्मशाला : हिमाचल प्रदेश निवडणूक प्रचारात तोंडसुख घेणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने रविवारी प्रतिहल्ला चढविला आणि मोदींच्या भाषणांतील ‘मित्रों’ या पालुपदाची लोकांनी आता धास्ती घेतली असल्याचा टोला लगावला.गुजरातमधील प्रचारात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘जीएसटी’ची फोड ‘गब्बर सिंग टॅक्स’ अशी केली होती. तेच सूत्र पकडून पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला येथील प्रचार सभेत मोदींची तुलना ‘शोले’ चित्रपटातील खलनायक गब्बर सिंग या डाकूशी केली. गब्बर सिंगने ‘कितने आदमी थे’ असे विचारले की, लोकांचा भीतीने थरकाप उडायचा. तशीच मोदींच्या ‘मित्रों’ या पालुपदाची लोकांनी आता धास्ती घेतली आहे. कारण आता नशिबी काय वाढून ठेवले आहे, याची त्यांना भीती वाटते, असे ते म्हणाले.मोदी सरकारने ‘पोकळ’ भाषणे बंद करावीतनवी दिल्ली : वाढत्या किमतींना आळा घालून लोकांना रोजगार देता येत नसेल, तर नरेंद्र मोदी सरकारने ‘पोकळ’ भाषणे देण्याचे थांबवावे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी हल्ला केला. टिष्ट्वटरवर गांधी म्हणाले की, ‘‘महेंगी गॅस, महेंगा रेशन, बंद करो, खोखला भाषण, दाम बांधो, काम दो, वर्ना खाली करो सिंघासन.’’ या टिष्ट्वटसोबत त्यांनी घरगुती गॅस व इतर वस्तूंच्या वाढलेल्या किमतीची बातमीही जोडली आहे. गुजरात दौºयात राहुल गांधी यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, बेरोजगारी, नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कर आणि खालावलेल्या आर्थिक परिस्थितीबद्दल मोदी सरकारवर जोरदार टीका करून, लोकांचे (विशेषत: समाज माध्यमांवर सक्रिय असलेल्यांचे) लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते.काँग्रेसने मैदानातून पळ काढला, निवडणूक एकतर्फीउना : हिमाचल प्रदेशातील निवडणुकीत आता मजा राहिली नाही. कारण काँग्रेसने मैदानातून पळ काढल्याने निवडणूक एकतर्फी झाली आहे, असे सांगतानाच, आम्हाला बहुमत मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उना येथे झालेल्या सभेत व्यक्त केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही निवडणूक आमचा पक्ष नव्हे, तर राज्यातील जनता लढवित आहे. भ्रष्टाचार आणि कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न, यावरून राज्यातील जनता काँग्रेसला धडा शिकविणार आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य करताना मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारने ५७ हजार कोटी रुपयांच्या सबसिडीचा दुरुपयोग केला. आम्ही हा दुरुपयोग थांबविला. गरिबांच्या कल्याणासाठी आता हा निधी वापरला जात आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी