शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

"लोकांना सरकारकडे भीक मागायची सवय लागली आहे"; मंत्र्यांचे भरसभेत वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 17:32 IST

मध्य प्रदेशात भाजपच्या मंत्र्याने एका सभेत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

MP Minister Prahlad Patel: मध्य प्रदेशात रस्त्यावर भिक्षा मागणाऱ्यांसंदर्भात करण्यात आलेल्या कायद्याची देशभरात चर्चा आहे.  मात्र आता मध्य प्रदेशच्या मंत्र्यांनी भिक्षेसंदर्भात केलेल्या एका विधानाने नवा वाद उफाळून आला आहे. मध्य प्रदेशचे पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. लोकांना सरकारकडून भीक मागण्याची सवय लागली आहे, असे वादग्रस्त विधान प्रल्हाद पटेल यांनी केलं. प्रल्हाद पटेल यांच्या विधानावरुन विरोधकांनी टीका केली असता त्यांनी अजब स्पष्टीकरण देखील दिलं. मी माझ्या समाजातील लोकांना सल्ले देत होतो असं प्रल्हाद पटेल यांन म्हटलं.

मध्य प्रदेशातल्या राजगड जिल्ह्यातील सुथलिया येथे शूर राणी अवंतीबाई लोधी यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला प्रल्हाद सिंह पटेल आले होते. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. जेव्हा जेव्हा एखादा नेता भेटायला येतो तेव्हा त्याला पत्र दिले जाते, हे चुकीचे आहे.  सरकारकडे भीक मागण्याची सवय लोकांना लागली आहे, असं प्रल्हाद सिंह पटेल म्हणाले. या विधानावर विरोधी पक्ष काँग्रेस आक्रमक झाला असून पटेल कोणाला भिकारी म्हणत आहेत, असा सवाल त्यांनी केला आहे.

"आता लोकांना सरकारकडे भीक मागण्याची सवय लागली आहे. कोणताही नेता आला की त्याला पत्रांनी भरलेली टोपली दिली जाते. हार घालतानाही पत्र दिले जाते. ही सवय चांगली नाही. घेण्याऐवजी देण्याची मानसिकता तयार करा. यामुळे मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हीही आनंदी व्हाल आणि एक सुसंस्कृत समाज निर्माण कराल. भिकाऱ्यांची ही फौज जमवणं...याने समाज मजबूत होत नाही. हे समाज कमकुवत करण्यासाठी आहे. फुकटच्या गोष्टींसाठी आकर्षित होणे म्हणजे शूर स्त्रियांचा आदर नाही," असं प्रल्हाद पटेल म्हणाले.

"अशा हुतात्म्याचे नाव कोणाला माहीत आहे का ज्याने कोणाकडे भीक मागितली आहे. कुठल्या हुतात्म्याने भिक मागितली असेल तर नाव सांगा. असे असूनही आपण येऊन आपला कार्यक्रम संपवून निघून जातो. मी फक्त एकच भिक्षा मागून माझे बोलणे संपवतो… मी नर्मदेच्या परिक्रमेचा रहिवासी आहे, म्हणून मी सुद्धा भिक्षा मागतो पण माझ्यासाठी कधीच नाही. प्रल्हाद पटेल यांना काही दिले असे कोणीही म्हणू शकत नाही," असंही प्रल्हाद पटेल म्हणाले.

प्रल्हाद पटेल यांचे स्पष्टीकरण

काँग्रेस नेते जीतू पटवारी यांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर मंत्री प्रल्हाद पटेल यांनी त्यांचे म्हणणं मांडले. माझ्या भाषणादरम्यान मी जे काही बोललो ते जनतेसाठी नव्हते, तर सामाजिक मेळाव्यासाठी होते. ती आपल्या समाजाची सभा असल्याने जनतेला भिकारी म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्या कार्यक्रमात  हे भाषण केले तो कार्यक्रम समाजाचा वैयक्तिक कार्यक्रम होता. ज्या स्टेजवर मी हे भाषण केले त्यावर काँग्रेसचे लोकही उपस्थित होते. माझा पक्ष आणि माझ्या नेतृत्वाला अडचणीत आणण्यासाठी जितू पटवारी प्रयत्न करत आहेत, असं स्पष्टीकरण प्रल्हाद पटेल यांनी दिलं.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा