शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

"लोकांना सरकारकडे भीक मागायची सवय लागली आहे"; मंत्र्यांचे भरसभेत वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 17:32 IST

मध्य प्रदेशात भाजपच्या मंत्र्याने एका सभेत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

MP Minister Prahlad Patel: मध्य प्रदेशात रस्त्यावर भिक्षा मागणाऱ्यांसंदर्भात करण्यात आलेल्या कायद्याची देशभरात चर्चा आहे.  मात्र आता मध्य प्रदेशच्या मंत्र्यांनी भिक्षेसंदर्भात केलेल्या एका विधानाने नवा वाद उफाळून आला आहे. मध्य प्रदेशचे पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. लोकांना सरकारकडून भीक मागण्याची सवय लागली आहे, असे वादग्रस्त विधान प्रल्हाद पटेल यांनी केलं. प्रल्हाद पटेल यांच्या विधानावरुन विरोधकांनी टीका केली असता त्यांनी अजब स्पष्टीकरण देखील दिलं. मी माझ्या समाजातील लोकांना सल्ले देत होतो असं प्रल्हाद पटेल यांन म्हटलं.

मध्य प्रदेशातल्या राजगड जिल्ह्यातील सुथलिया येथे शूर राणी अवंतीबाई लोधी यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला प्रल्हाद सिंह पटेल आले होते. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. जेव्हा जेव्हा एखादा नेता भेटायला येतो तेव्हा त्याला पत्र दिले जाते, हे चुकीचे आहे.  सरकारकडे भीक मागण्याची सवय लोकांना लागली आहे, असं प्रल्हाद सिंह पटेल म्हणाले. या विधानावर विरोधी पक्ष काँग्रेस आक्रमक झाला असून पटेल कोणाला भिकारी म्हणत आहेत, असा सवाल त्यांनी केला आहे.

"आता लोकांना सरकारकडे भीक मागण्याची सवय लागली आहे. कोणताही नेता आला की त्याला पत्रांनी भरलेली टोपली दिली जाते. हार घालतानाही पत्र दिले जाते. ही सवय चांगली नाही. घेण्याऐवजी देण्याची मानसिकता तयार करा. यामुळे मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हीही आनंदी व्हाल आणि एक सुसंस्कृत समाज निर्माण कराल. भिकाऱ्यांची ही फौज जमवणं...याने समाज मजबूत होत नाही. हे समाज कमकुवत करण्यासाठी आहे. फुकटच्या गोष्टींसाठी आकर्षित होणे म्हणजे शूर स्त्रियांचा आदर नाही," असं प्रल्हाद पटेल म्हणाले.

"अशा हुतात्म्याचे नाव कोणाला माहीत आहे का ज्याने कोणाकडे भीक मागितली आहे. कुठल्या हुतात्म्याने भिक मागितली असेल तर नाव सांगा. असे असूनही आपण येऊन आपला कार्यक्रम संपवून निघून जातो. मी फक्त एकच भिक्षा मागून माझे बोलणे संपवतो… मी नर्मदेच्या परिक्रमेचा रहिवासी आहे, म्हणून मी सुद्धा भिक्षा मागतो पण माझ्यासाठी कधीच नाही. प्रल्हाद पटेल यांना काही दिले असे कोणीही म्हणू शकत नाही," असंही प्रल्हाद पटेल म्हणाले.

प्रल्हाद पटेल यांचे स्पष्टीकरण

काँग्रेस नेते जीतू पटवारी यांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर मंत्री प्रल्हाद पटेल यांनी त्यांचे म्हणणं मांडले. माझ्या भाषणादरम्यान मी जे काही बोललो ते जनतेसाठी नव्हते, तर सामाजिक मेळाव्यासाठी होते. ती आपल्या समाजाची सभा असल्याने जनतेला भिकारी म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्या कार्यक्रमात  हे भाषण केले तो कार्यक्रम समाजाचा वैयक्तिक कार्यक्रम होता. ज्या स्टेजवर मी हे भाषण केले त्यावर काँग्रेसचे लोकही उपस्थित होते. माझा पक्ष आणि माझ्या नेतृत्वाला अडचणीत आणण्यासाठी जितू पटवारी प्रयत्न करत आहेत, असं स्पष्टीकरण प्रल्हाद पटेल यांनी दिलं.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा