शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

'राम, हनुमान मुद्द्यांमुळे जनता निराश'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 05:18 IST

लोकजनशक्ती पार्टीही नाराज

पाटणा : पाच राज्यांतील निकालांवर भाष्य करताना लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी म्हटले आहे की, मोदी लाट ओसरल्याचे हे संकेत नाहीत, तर लोकांना एनडीएकडून विकास हवा आहे. राममंदिर आणि हनुमानाचे मुद्दे जेव्हा चर्चेत येतात तेव्हा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि ते निराश होतात.येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपाशासित राज्यात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये शिवराज सिंह चौहान आणि रमन सिंह हे दीर्घ काळापासून मुख्यमंत्री होते; पण त्यांनी अ‍ॅन्टी इन्कम्बन्सीनंतरही चांगला लढा दिला.एलजेपीच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्ष असलेले चिराग पासवान म्हणाले की, मी असे म्हणणार नाही की, निकाल मोदींच्या बाजूने आहेत; पण यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हिंदी भाषक राज्यात भाजपाच्या पराभवाबद्दल काय सांगाल, असा सवाल केला असता ते म्हणाले की, याबाबत मी बोलणार नाही; पण विकास हा भाजपाचा आदर्श राहिलेला आहे.भाजपापासून जाणार दूर?राममंदिरासाठी मोदी सरकार वटहुकूम आणू शकते काय? याबाबत सवाल केला असता पासवान म्हणाले की, जर असा वटहुकूम आणण्याचे सरकारने ठरविले, तर त्याबाबतची भूमिका आपला पक्ष निश्चितच करील.तूर्तास, याप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाची आम्हाला प्रतीक्षा आहे.एनडीएचे सहकारी उपेंद्र कुशवाह आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आणि पाच राज्यांतील भाजपाच्या पराभवानंतर आता एलजेपी आणि जनता दल युनायटेड भाजपापासून अंतर राखणार काय? अशी चर्चा सुरू झालेली आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीBJPभाजपा