शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

'लोक कोरोनाकडे दुर्लक्ष करू लागलेत, तिसरी लाट केव्हाही धडक देईल'; शास्त्रज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 18:15 IST

देशात कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याचं दिसत असताना लोक मोठ्या संख्येनं पर्यटन स्थळांवर गर्दी करत आहेत.

देशात कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याचं दिसत असताना लोक मोठ्या संख्येनं पर्यटन स्थळांवर गर्दी करत आहेत. सार्वजनिक आणि पर्यटन स्थळांवर कोरोना प्रतिबंधक नियमांना धाब्यावर बसवत लोक गर्दी करत आहेत. यावर शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना संक्रमणाला नियंत्रित करण्यासाठी समाजाची भूमिका अतिशय महत्वाची असते. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि सध्या लोक संकट पाहू शकत नाहीतयत असं दिसत आहे. त्यामुळे जनतेच्या वृत्ती बदल करण्यासाठी सरकारची भूमिका अतिशय महत्वाची असते. पण दुर्दैवानं देशातील जनतेचा राजकीय पक्षांवर खूप कमी विश्वास राहिला आहे, असंही स्पष्ट मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

कोरोना प्रादुर्भावाचं गांभीर्य आणि लसीकरणाच्या वेगाचा दराबाबतच्या अस्पष्ट भूमिकेमुळे संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमध्ये डोंगराळ भागातील पर्यटन स्थळांवर लोक गर्दी करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यात वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचंही दिसून आलं आहे. ही अतिशय चिंतेची बाब असून आपलं आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याच्या भानगडीत लोक संकटाला निमंत्रण देत आहेत, असं शास्त्रज्ञांनी नमूद केलं आहे. 

कोरोना प्रतिबंधक नियमांकडे दुर्लक्ष करणं, नियमांबाबत लोकांची उदासीन वृत्ती आणि जे होईल ते देवाच्या मर्जीनं होईल अशा भावनेतून वागणं घातक ठरू शकतं, असं साथरोग तज्ज्ञ ललित कांत यांनी म्हटलं. मास्क न वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न करणं यातून लोकांना समोरील संकट दिसत नाहीय हेच लक्षात येतं. तिसरी लाट कोणत्याही क्षणी धडक देऊ शकते याचा विचार करायला हवा, असं मानवी वर्तवणूक आणि संबद्ध विज्ञान संस्थेचे संचालक निमेश देसाई यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस