शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

'लोक कोरोनाकडे दुर्लक्ष करू लागलेत, तिसरी लाट केव्हाही धडक देईल'; शास्त्रज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 18:15 IST

देशात कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याचं दिसत असताना लोक मोठ्या संख्येनं पर्यटन स्थळांवर गर्दी करत आहेत.

देशात कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याचं दिसत असताना लोक मोठ्या संख्येनं पर्यटन स्थळांवर गर्दी करत आहेत. सार्वजनिक आणि पर्यटन स्थळांवर कोरोना प्रतिबंधक नियमांना धाब्यावर बसवत लोक गर्दी करत आहेत. यावर शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना संक्रमणाला नियंत्रित करण्यासाठी समाजाची भूमिका अतिशय महत्वाची असते. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि सध्या लोक संकट पाहू शकत नाहीतयत असं दिसत आहे. त्यामुळे जनतेच्या वृत्ती बदल करण्यासाठी सरकारची भूमिका अतिशय महत्वाची असते. पण दुर्दैवानं देशातील जनतेचा राजकीय पक्षांवर खूप कमी विश्वास राहिला आहे, असंही स्पष्ट मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

कोरोना प्रादुर्भावाचं गांभीर्य आणि लसीकरणाच्या वेगाचा दराबाबतच्या अस्पष्ट भूमिकेमुळे संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमध्ये डोंगराळ भागातील पर्यटन स्थळांवर लोक गर्दी करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यात वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचंही दिसून आलं आहे. ही अतिशय चिंतेची बाब असून आपलं आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याच्या भानगडीत लोक संकटाला निमंत्रण देत आहेत, असं शास्त्रज्ञांनी नमूद केलं आहे. 

कोरोना प्रतिबंधक नियमांकडे दुर्लक्ष करणं, नियमांबाबत लोकांची उदासीन वृत्ती आणि जे होईल ते देवाच्या मर्जीनं होईल अशा भावनेतून वागणं घातक ठरू शकतं, असं साथरोग तज्ज्ञ ललित कांत यांनी म्हटलं. मास्क न वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न करणं यातून लोकांना समोरील संकट दिसत नाहीय हेच लक्षात येतं. तिसरी लाट कोणत्याही क्षणी धडक देऊ शकते याचा विचार करायला हवा, असं मानवी वर्तवणूक आणि संबद्ध विज्ञान संस्थेचे संचालक निमेश देसाई यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस