शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 16:51 IST

'2026 मध्ये पश्चिम बंगालला ममता बॅनर्जींच्या दहशतीतून मुक्ती मिळेल.'

Amit Shah in West Bengal : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी(27 ऑक्टोबर 2024) पश्चिम बंगालमध्ये आयोजित पक्षाच्या सदस्यत्व नोंदणी कार्यक्रमात बोलताना बांग्लादेशातून होणाऱ्या बेकायदेशीर घुसखोरीवर तीव्र प्रतिक्रिया दिली. ही घुसखोरी थांबवली तरच पश्चिम बंगालमध्ये शांतता शक्य असल्याचे ठामपणे सांगितले. याशिवाय, त्यांनी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होण्याचा दावा केला. 

शाह म्हणाले, 2026 साली भाजप प्रचंड बहुमताने पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल आणि बंगालला सोनार बांगला बनवले जाईल. बंगालला कम्युनिस्ट आणि ममता यांच्या दहशतीतून मुक्त करावे लागेल, त्यासाठी भाजपचे सरकार स्थापन करणे गरजेचे आहे. यासोबतच महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. 

बंगालमध्ये माता-भगिनी सुरक्षित नाहीतशाह पुढे म्हणतात, संदेशखळी, आरजी कारच्या घटनांनी हे सिद्ध होते की बंगालमध्ये आमच्या माता, बहिणी सुरक्षित नाहीत. राज्य पुरस्कृत घुसखोरी, बंगालमधील भ्रष्टाचार रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 2026 मध्ये भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी निवडून देणे. राज्य समर्थित घुसखोरी थांबवायची असेल तर 2026 मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन करावे लागेल. बंगालमध्ये रवींद्र संगीताऐवजी बॉम्बस्फोट ऐकू येतात, त्यामुळे हे थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बंगालमध्ये भाजपचे सरकार बनवणे. जे राजकारण ममता दीदींनी सुरू केले, ते 2026 मध्ये संपणार आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

घुसखोरी थांबवायची असेल तर...पश्चिम बंगालमध्ये तेव्हाच शांतता येऊ शकते, जेव्हा बांग्लादेशातून होणारी बेकायदेशीर घुसखोरी पूर्णपणे थांबवली जाईल. यासाठी राज्यात भाजपचे सरकार येणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार आणि ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था यामुळे राज्यातील शांतता आणि विकासाला खीळ बसली आहे. मी बंगालच्या जनतेला 2026 मध्ये राजकीय बदल घडवून आणण्याची आणि भाजपला सत्तेत आणून राज्यात शांतता आणि सुरक्षिततेचा पाया घालण्याची विनंती करतो, असेही शाह यावेळी म्हणाले.

एक कोटी भाजप सदस्य बनवण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्ष जातीच्या आधारावर चालतात, मात्र भाजप हा एकमेव पक्ष आहे, ज्याचा सामान्य कार्यकर्ताही पंतप्रधान होऊ शकतो. लोक जेव्हा भाजपचे सदस्य होतात, तेव्हा ते या देशाला महान बनवण्याच्या आणि देशाचे रक्षण करण्याच्या संकल्पाने स्वतःला समर्पित करतात. करोडो लोकांच्या कल्याणाशी ते स्वतःला जोडून घेतात. भारत मातेला जागतिक नेता बनवण्याची शपथ घ्या. मी बंगालच्या लोकांना आणि तरुणांना भारतीय जनता पक्षाचे सदस्य होण्याचे आवाहन करतो.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहwest bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जी