शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 16:51 IST

'2026 मध्ये पश्चिम बंगालला ममता बॅनर्जींच्या दहशतीतून मुक्ती मिळेल.'

Amit Shah in West Bengal : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी(27 ऑक्टोबर 2024) पश्चिम बंगालमध्ये आयोजित पक्षाच्या सदस्यत्व नोंदणी कार्यक्रमात बोलताना बांग्लादेशातून होणाऱ्या बेकायदेशीर घुसखोरीवर तीव्र प्रतिक्रिया दिली. ही घुसखोरी थांबवली तरच पश्चिम बंगालमध्ये शांतता शक्य असल्याचे ठामपणे सांगितले. याशिवाय, त्यांनी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होण्याचा दावा केला. 

शाह म्हणाले, 2026 साली भाजप प्रचंड बहुमताने पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल आणि बंगालला सोनार बांगला बनवले जाईल. बंगालला कम्युनिस्ट आणि ममता यांच्या दहशतीतून मुक्त करावे लागेल, त्यासाठी भाजपचे सरकार स्थापन करणे गरजेचे आहे. यासोबतच महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. 

बंगालमध्ये माता-भगिनी सुरक्षित नाहीतशाह पुढे म्हणतात, संदेशखळी, आरजी कारच्या घटनांनी हे सिद्ध होते की बंगालमध्ये आमच्या माता, बहिणी सुरक्षित नाहीत. राज्य पुरस्कृत घुसखोरी, बंगालमधील भ्रष्टाचार रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 2026 मध्ये भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी निवडून देणे. राज्य समर्थित घुसखोरी थांबवायची असेल तर 2026 मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन करावे लागेल. बंगालमध्ये रवींद्र संगीताऐवजी बॉम्बस्फोट ऐकू येतात, त्यामुळे हे थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बंगालमध्ये भाजपचे सरकार बनवणे. जे राजकारण ममता दीदींनी सुरू केले, ते 2026 मध्ये संपणार आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

घुसखोरी थांबवायची असेल तर...पश्चिम बंगालमध्ये तेव्हाच शांतता येऊ शकते, जेव्हा बांग्लादेशातून होणारी बेकायदेशीर घुसखोरी पूर्णपणे थांबवली जाईल. यासाठी राज्यात भाजपचे सरकार येणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार आणि ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था यामुळे राज्यातील शांतता आणि विकासाला खीळ बसली आहे. मी बंगालच्या जनतेला 2026 मध्ये राजकीय बदल घडवून आणण्याची आणि भाजपला सत्तेत आणून राज्यात शांतता आणि सुरक्षिततेचा पाया घालण्याची विनंती करतो, असेही शाह यावेळी म्हणाले.

एक कोटी भाजप सदस्य बनवण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्ष जातीच्या आधारावर चालतात, मात्र भाजप हा एकमेव पक्ष आहे, ज्याचा सामान्य कार्यकर्ताही पंतप्रधान होऊ शकतो. लोक जेव्हा भाजपचे सदस्य होतात, तेव्हा ते या देशाला महान बनवण्याच्या आणि देशाचे रक्षण करण्याच्या संकल्पाने स्वतःला समर्पित करतात. करोडो लोकांच्या कल्याणाशी ते स्वतःला जोडून घेतात. भारत मातेला जागतिक नेता बनवण्याची शपथ घ्या. मी बंगालच्या लोकांना आणि तरुणांना भारतीय जनता पक्षाचे सदस्य होण्याचे आवाहन करतो.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहwest bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जी