शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 16:51 IST

'2026 मध्ये पश्चिम बंगालला ममता बॅनर्जींच्या दहशतीतून मुक्ती मिळेल.'

Amit Shah in West Bengal : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी(27 ऑक्टोबर 2024) पश्चिम बंगालमध्ये आयोजित पक्षाच्या सदस्यत्व नोंदणी कार्यक्रमात बोलताना बांग्लादेशातून होणाऱ्या बेकायदेशीर घुसखोरीवर तीव्र प्रतिक्रिया दिली. ही घुसखोरी थांबवली तरच पश्चिम बंगालमध्ये शांतता शक्य असल्याचे ठामपणे सांगितले. याशिवाय, त्यांनी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होण्याचा दावा केला. 

शाह म्हणाले, 2026 साली भाजप प्रचंड बहुमताने पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल आणि बंगालला सोनार बांगला बनवले जाईल. बंगालला कम्युनिस्ट आणि ममता यांच्या दहशतीतून मुक्त करावे लागेल, त्यासाठी भाजपचे सरकार स्थापन करणे गरजेचे आहे. यासोबतच महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. 

बंगालमध्ये माता-भगिनी सुरक्षित नाहीतशाह पुढे म्हणतात, संदेशखळी, आरजी कारच्या घटनांनी हे सिद्ध होते की बंगालमध्ये आमच्या माता, बहिणी सुरक्षित नाहीत. राज्य पुरस्कृत घुसखोरी, बंगालमधील भ्रष्टाचार रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 2026 मध्ये भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी निवडून देणे. राज्य समर्थित घुसखोरी थांबवायची असेल तर 2026 मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन करावे लागेल. बंगालमध्ये रवींद्र संगीताऐवजी बॉम्बस्फोट ऐकू येतात, त्यामुळे हे थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बंगालमध्ये भाजपचे सरकार बनवणे. जे राजकारण ममता दीदींनी सुरू केले, ते 2026 मध्ये संपणार आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

घुसखोरी थांबवायची असेल तर...पश्चिम बंगालमध्ये तेव्हाच शांतता येऊ शकते, जेव्हा बांग्लादेशातून होणारी बेकायदेशीर घुसखोरी पूर्णपणे थांबवली जाईल. यासाठी राज्यात भाजपचे सरकार येणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार आणि ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था यामुळे राज्यातील शांतता आणि विकासाला खीळ बसली आहे. मी बंगालच्या जनतेला 2026 मध्ये राजकीय बदल घडवून आणण्याची आणि भाजपला सत्तेत आणून राज्यात शांतता आणि सुरक्षिततेचा पाया घालण्याची विनंती करतो, असेही शाह यावेळी म्हणाले.

एक कोटी भाजप सदस्य बनवण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्ष जातीच्या आधारावर चालतात, मात्र भाजप हा एकमेव पक्ष आहे, ज्याचा सामान्य कार्यकर्ताही पंतप्रधान होऊ शकतो. लोक जेव्हा भाजपचे सदस्य होतात, तेव्हा ते या देशाला महान बनवण्याच्या आणि देशाचे रक्षण करण्याच्या संकल्पाने स्वतःला समर्पित करतात. करोडो लोकांच्या कल्याणाशी ते स्वतःला जोडून घेतात. भारत मातेला जागतिक नेता बनवण्याची शपथ घ्या. मी बंगालच्या लोकांना आणि तरुणांना भारतीय जनता पक्षाचे सदस्य होण्याचे आवाहन करतो.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहwest bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जी