शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

काश्मीरमध्ये शांततेचं वातावरण; युरोपियन मंडळाचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 12:33 IST

कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये शांततेचं वातावरण असल्याचे युरोपियन मंडळाचे खासदार थेरी मरियानी यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

युरोपियन युनियनचं शिष्टमंडळाने गेल्या दोन दिवसांपासून जम्मू- काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. कलम 370 जम्मू- काश्मीरमधून हटविल्यानंतर पहिल्यांदाच शिष्टमंडळाने या भागाला भेट दिली. या भेटीनंतर कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये शांततेचं वातावरण असल्याचे युरोपियन मंडळाचे खासदार थेरी मरियानी यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

थेरी मरियानी म्हणाले की, दहशतवाद हा जागतिक प्रश्न असून दहशतवादच्या विरोधात आम्ही भारतसोबत आहे. जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद ही सर्वात मोठी समस्या असून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे असं म्हणत पाकिस्तानला खडेबोल त्यांनी सुनावले.

तसेच मी जवळपास 20वेळा भारतमध्ये आलो आहे. याआधी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरु या शहरांमध्ये गेलो होतो. जम्मू- काश्मीरमध्ये जाऊन परिस्थिती जाणून घेणं हे आमचे लक्ष्य होते. आम्ही स्थानिक परिस्थितीचा आढाव घेतल्यास काश्मीरमधली परिस्थिती आता सुधारत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे काश्मीरमधील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर नागरिकांनी देखील शांततेबाबत आपले मत व्यक्त केल्याचे थेरी मरियानी यांनी सांगितले आहे. 

मजुरांची हत्या खूप वेदनादायक 

युरोपियन युनियनचं शिष्टमंडळाचे खासदार बिल न्यूटन यांनी मंगळवारी मजदूराची हत्येचं उदाहरण देत अशा प्रकारच्या हत्या होणं खूप वेदानादायक असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. त्याचप्रमाणे काश्मीरमधील काही नागरिकांनी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या पैशांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे सांगितले असं देखील बिल न्यूटन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. 

काश्मीरमध्ये मोकळेपणानं फिरू द्या, लोकांना भेटू द्या; EU खासदाराची मागणी अमान्य

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 काढल्यानंतर जगभरात हा विषय चर्चेत आला. पाकिस्ताननं अनेकदा जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या परिषदांमध्ये जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. मात्र सगळ्याच व्यासपीठांवर पाकिस्तानला अपयश आलं. यानंतर युरोपियन युनियनचं शिष्टमंडळाने जम्मू काश्मीरला भेट दिली. या शिष्टमंडळात 28 सदस्यांचा समावेश आहे. आतापर्यंत भारतानं कोणत्याही परदेशी शिष्टमंडळाला जम्मू काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी दिली नव्हती. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Narendra Modiनरेंद्र मोदी