शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

"गॅससाठी पैसे नाहीत, चुलीवर अन्न..."; IAS च्या आईचा Video शेअर करून सपाची भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 13:11 IST

पवनच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्याची आई सुमन म्हणाली की, घरात उज्ज्वला योजनेंतर्गत दिलेला सिलिंडर आहे, पण तो सिलिंडर भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे चुलीवर अन्न शिजवावं लागतं.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील रहिवासी असलेल्या पवन कुमारला यूपीएससी परीक्षेत 239 वा रँक मिळाला आहे. पवनच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्याची आई सुमन म्हणाली की, घरात उज्ज्वला योजनेंतर्गत दिलेला सिलिंडर आहे, पण तो सिलिंडर भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे चुलीवर अन्न शिजवावं लागतं. मुलगा पवनने कठीण परिस्थितीत हे स्थान मिळवलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामुळे समाजवादी पार्टीने आता भाजपावर निशाणा साधला आहे.

यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पवन कुमारच्या आईचा व्हिडीओ शेअर करताना सपाने ट्विटरवर लिहिलं की, त्यांच्याकडे गॅससाठी पैसे नाहीत, त्यामुळे चूल पेटवावी लागते. हे भाजपा सरकारच्या 'न्यू इंडिया'चे वास्तव आहे. "मुलगा यूपीएससी पास झाला तेव्हा ही बाब समोर आली, नाहीतर कोण विचारायला जाणार होतं? भाजपा देशभर खोटं बोलत आहे. आता हे घोटाळेबाज सरकार नको. भाजपाला हटवा, देश वाचवा" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

24 वर्षीय पवन कुमार तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत 239 वा रँक मिळवून आयएएस झाला आहे, परंतु त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अशी आहे की त्याच्याकडे उज्ज्वला योजनेतील गॅस सिलिंडर भरण्यासाठी देखील पैसे नाहीत. वडील आणि बहिणींनी मजूर म्हणून काम केलं तेव्हाच त्यांच्या कोचिंग आणि पुस्तकांचा खर्च भागवू शकले आणि नंतर 3200 रुपये किमतीचा सेकंड हँड फोन विकत घेतला.

पवन कुमार हा बुलंदशहर जिल्ह्यातील रघुनाथपूर गावचा रहिवासी आहे. मुलाच्या यशावर त्याचे वडील मुकेश कुमार आणि आई सुमन खूप आनंदी आहेत. पवनचे कुटुंब राहत असलेल्या घरात वीज जोडणी आहे, मात्र ग्रामीण भागात वीज पुरवठ्याची कमतरता आहे. घरात दुसरी कोणतीही सोय नाही. छप्पर देखील ताडपत्री आणि पॉलिथिनचे बनलेले आहे.

UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पवनची आई आणि बहीण जंगलातून लाकडे गोळा करतात आणि चुलीवर अन्न शिजवतात. कारण, उज्ज्वला योजनेंतर्गत या कुटुंबाला गॅस सिलिंडर मिळाला होता, पण नंतर ते भरण्यासाठी एक हजार रुपयेही जमू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना चुलीवर अन्न शिजवावे लागत आहे. यावरून सपाने भाजपावर निशाणा साधला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत मिळालेल्या सिलिंडरमध्ये गॅस न भरल्याबद्दल सपाने भाजपावर ताशेरे ओढले आहेत.  

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीPoliticsराजकारण