शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'देशभक्ती म्हणजे उत्तम शिक्षण, हॉस्पिटल सुविधा, वीज, अन् पाणी पुरवणे होय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 13:56 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकी 2015च्या निवडणुकांसारखाच यंदाही आपने मोठा विजय मिळवला.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2020मध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतल्या रामलीला मैदानात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे, केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. याबाबत माहिती देत, शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांनी भाजपाला टोला लगावला. लोकांना शिक्षण, वीज अन् पाणी देणे हीच खरी देशभक्ती असल्याचे सिसोदिया यांनी म्हटले.  

दिल्ली विधानसभा निवडणुकी 2015च्या निवडणुकांसारखाच यंदाही आपने मोठा विजय मिळवला. आपनं 62 जागांवर विजय मिळवलेला असून, गत निवडणुकीच्या तुलनेत 5 जागा कमी झालेल्या आहेत. भाजपाला या निवडणुकीत 8 जागाच राखता आल्या. तर काँग्रेसच्या 67 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. निवडणूक निकालाचं विश्लेषण करताना मनिष सिसोदिया यांनी भाजपवर शरसंधान साधले. ''जे लोक कामाला पसंती देतात, तेच देशभक्त असतात. सरकारचं काम लोकांच्या जीवनात सुधारणे करणे आहे, लोकांना मदत करणे आहे, नागरिकांच्या कुटुंबांना समृद्ध बनविणे आहे, म्हणजेच देशाला समृद्ध बनवणे होय. म्हणूनच, दिल्लीतील जनतेनं अपेक्षेपेक्षा जास्त सन्मान आम्हाला दिलाय, आमच्या कामाचा सन्मान केलाय,'' असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटलंय. 

द्वेषाच्या राजकारणाला दिल्लीकरांनी झुगारून प्रेम आणि स्नेहाचं राजकारण स्विकारलंय. देशभक्ती म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाला उत्कृष्ट शिक्षण, आरोग्य आणि उपचार देणे होय. राष्ट्रभक्ती म्हणजे देशातील प्रत्येक कुटुंबास स्वस्त दरात आणि 24 तास वीज पुरविणे होय. लोकांना शुद्ध पाणी देणे हे सर्व करणे म्हणजेच देशभक्ती असल्याचंही सिसोदिया यांनी म्हटलंय. सिसोदिया यांनी भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाव न घेता टोला लगावला. कारण, भाजपाकडून अरविंद केजरीवाल यांना गद्दार आणि देशद्रोही असल्याचं संबोधलं जात होतं. मात्र, दिल्लीच्या जनतेनं पुन्हा एकदा केजरीवाल यांना निवडून देत, भाजपाच्या प्रचाराला नकारलंय.  

टॅग्स :AAPआपdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी