लखनऊ: देशातील ज्वलंत मुद्दे बाजूला सारण्यासाठीच जिल्हा आणि शहरांची नावं बदलण्याची उठाठेव सुरू आहे, अशा शब्दांमध्ये पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. सीबीआयमधील अंतर्गत वाद, राफेल घोटाळा, आरबीआयची स्वायत्तता असे अनेक गंभीर विषय सध्या देशासमोर आहेत. मात्र या मुद्यांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आता राम मंदिराचा मुद्दा रेटला जात आहे. भाजपा आणि संघाकडून देशातील वातावरण गढूळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा शब्दांमध्ये हार्दिक यांनी भाजपावर तोफ डागली. फक्त जागांची नावं बदलून देश संपन्न होणार असेल, तर 125 कोटी भारतीयांचं नाव बदलून राम ठेवा, असा टोलाही त्यांनी लगावला. ते उत्तर प्रदेशात एका सभेला संबोधित करत होते.
सव्वाशे कोटी भारतीयांचं नाव बदलून राम ठेवा; हार्दिक पटेलांचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 10:46 IST