शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सव्वाशे कोटी भारतीयांचं नाव बदलून राम ठेवा; हार्दिक पटेलांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 10:46 IST

नामांतराच्या मुद्यावरुन हार्दिक पटेल यांची भाजपावर जोरदार टीका

लखनऊ: देशातील ज्वलंत मुद्दे बाजूला सारण्यासाठीच जिल्हा आणि शहरांची नावं बदलण्याची उठाठेव सुरू आहे, अशा शब्दांमध्ये पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. सीबीआयमधील अंतर्गत वाद, राफेल घोटाळा, आरबीआयची स्वायत्तता असे अनेक गंभीर विषय सध्या देशासमोर आहेत. मात्र या मुद्यांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आता राम मंदिराचा मुद्दा रेटला जात आहे. भाजपा आणि संघाकडून देशातील वातावरण गढूळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा शब्दांमध्ये हार्दिक यांनी भाजपावर तोफ डागली. फक्त जागांची नावं बदलून देश संपन्न होणार असेल, तर 125 कोटी भारतीयांचं नाव बदलून राम ठेवा, असा टोलाही त्यांनी लगावला. ते उत्तर प्रदेशात एका सभेला संबोधित करत होते. उत्तर प्रदेशातील योगी सरकारनं काही दिवसांपूर्वीच अलाहाबाद आणि फैजाबादचं नामांतर केलं. अलाहाबादला प्रयागराज आणि फैजाबादला अयोध्या नाव देण्याच्या प्रस्तावाला उत्तर प्रदेश सरकारनं मंजुरी दिली. यावरुन हार्दिक पटेल यांनी सरकारवर निशाणा साधला. मुलभूत प्रश्नांपासून लोकांचं लक्ष विचलित व्हावं, यासाठी सरकार नामांतराचे उपद्व्याप करत असल्याची टीका त्यांनी केली. उत्तर प्रदेशात बेरोजगारी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हजारो तरुणांकडे रोजगार नाहीत, असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं.भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराची आठवण झाल्याचं हार्दिक पटेल म्हणाले. राम मंदिराचा वापर भाजपाकडून केवळ मतांसाठी सुरू आहे. गुजरातच्या प्रत्येक गावात रामाचं मंदिर आहे. मात्र रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत रामाचं मंदिर नाही, असं हार्दिक यांनी म्हटलं. भाजपाला केवळ निवडणुकीपुरती रामाची आठवण होत असल्याची टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलUttar Pradeshउत्तर प्रदेशAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरBJPभाजपा