शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Indian Railway:३५ रुपयांसाठी प्रवाशाने रेल्वेविरोधात ५ वर्षे लढली केस, निकालानंतर आता लाखो प्रवाशांचा झाला फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 13:30 IST

Indian Railway: रेल्वेने तिकीट बुक करताना सर्व्हिस चार्ज म्हणून ३५ रुपये कापले होते. मात्र मात्र तिकीट रद्द केल्यानंतर स्वामी यांना याचं रिफंड मिळाले नाहीत. स्वामी रिफंड मिळवण्यासाठी अडून राहिले. तसेच पाच वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना यश मिळाले

नवी दिल्ली - जेव्हा कुणी रेल्वेचं तिकीट बुक करतो तेव्हा पेमेंट गेटवे चार्जपासून सर्व्हिस चार्जपर्यंतचे चार्ज कापले जातात. कोटा येथील राहणारे इंजिनियर सुजीत स्वामी यांनीही पाच वर्षांपूर्वी रेल्वेचं तिकीट बुक केलं होतं. मात्र नंतर त्यांनी तिकीट कॅन्सल केलं होतं. रेल्वेने तिकीट बुक करताना सर्व्हिस चार्ज म्हणून ३५ रुपये कापले होते. मात्र मात्र तिकीट रद्द केल्यानंतर स्वामी यांना याचं रिफंड मिळाले नाहीत. स्वामी रिफंड मिळवण्यासाठी अडून राहिले. तसेच पाच वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना यश मिळाले. महत्त्वाची बाब म्हणजे स्वामींच्या रेल्वेविरोधातील पाच वर्षांच्या लढ्याने सुमारे ३ लाख लोकांना फायदा मिळाला आहे.

स्वामी यांनी रिफंड मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराची मदत घेतली. त्यांनी सांगितले की, सर्व्हिच चार्जचे ३५ रुपये परत मिळवण्यासाठी त्यांना सरकारी विभागाला अनेक पत्रं लिहावी लागली. त्यांनी सुमारे ५० आरटीआय अर्ज फाईल केले. अखेरीस रेल्वेने सर्व्हिस चार्ज म्हणून वसूल केलेले २.४२ कोटी रुपये रिफंड करण्यास मान्यता दिली. हे कोट्यवधी रुपये २.९८ लाख आरटीआय युझर्सच्या माध्यमातून वसूल करण्यात आले होते. यामध्ये अनेक युझर्सनी एकापेक्षा अनेक वेळा तिकीट बुक करून कॅन्सल केले होते.

स्वामी यांनी एप्रिल २०१७ मध्ये कोटा येथून दिल्लीला जाण्यासाटी गोल्डन टेम्पल मेलचं एक तिकीट बुक केले होते. ते २ जुलैच्या प्रवासासाठी होते. त्यानंतर बरोबर एका दिवसापूर्वी म्हणजेच १ जुलैपासून जीएसटी लागू झाला होता. त्यांनी ७६५ रुपयांमध्ये तिकीट बुक केले होते. जेव्हा त्यांनी तिकीट कॅन्सल केले तेव्हा ६५ रुपयांऐवजी १०० रुपये कापून त्यांनी ६६५ रुपयांचा रिफंड मिळाले. मात्र जीएसटी लागू होण्यापूर्वी तिकीट रद्द केले तरी सर्व्हिस चार्ज म्हणून ३५ रुपये कापले होते.

आरटीआयच्या माध्यमातून दीर्घकालीन लढाई लढल्यानंतर स्वामी यांना १ मे २०१९ रोजी ३३ रुपयांचे रिफंड मिळाले. तेव्हा सर्व्हिस टॅक्सच्या राऊंडेड ऑफ व्हॅल्यूच्या नावावर २ रुपये कापण्यात आले. त्यानंतर स्वामी यांनी २ रुपयांसाठी पुन्हा लढाई सुरू केली. अखेर गेल्या आठवड्यात त्यांना यश मिळाले. आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना २.९८ लाख युझर्सना संपूर्ण ३५ रुपरे रिफंड करण्याची माहिती दिली. तसेच बँक डिटेल्स पाठवल्यावर त्यांना २ रुपये परत मिळाले.  

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीIndian Railwayभारतीय रेल्वेMONEYपैसा