शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Indian Railway:३५ रुपयांसाठी प्रवाशाने रेल्वेविरोधात ५ वर्षे लढली केस, निकालानंतर आता लाखो प्रवाशांचा झाला फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 13:30 IST

Indian Railway: रेल्वेने तिकीट बुक करताना सर्व्हिस चार्ज म्हणून ३५ रुपये कापले होते. मात्र मात्र तिकीट रद्द केल्यानंतर स्वामी यांना याचं रिफंड मिळाले नाहीत. स्वामी रिफंड मिळवण्यासाठी अडून राहिले. तसेच पाच वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना यश मिळाले

नवी दिल्ली - जेव्हा कुणी रेल्वेचं तिकीट बुक करतो तेव्हा पेमेंट गेटवे चार्जपासून सर्व्हिस चार्जपर्यंतचे चार्ज कापले जातात. कोटा येथील राहणारे इंजिनियर सुजीत स्वामी यांनीही पाच वर्षांपूर्वी रेल्वेचं तिकीट बुक केलं होतं. मात्र नंतर त्यांनी तिकीट कॅन्सल केलं होतं. रेल्वेने तिकीट बुक करताना सर्व्हिस चार्ज म्हणून ३५ रुपये कापले होते. मात्र मात्र तिकीट रद्द केल्यानंतर स्वामी यांना याचं रिफंड मिळाले नाहीत. स्वामी रिफंड मिळवण्यासाठी अडून राहिले. तसेच पाच वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना यश मिळाले. महत्त्वाची बाब म्हणजे स्वामींच्या रेल्वेविरोधातील पाच वर्षांच्या लढ्याने सुमारे ३ लाख लोकांना फायदा मिळाला आहे.

स्वामी यांनी रिफंड मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराची मदत घेतली. त्यांनी सांगितले की, सर्व्हिच चार्जचे ३५ रुपये परत मिळवण्यासाठी त्यांना सरकारी विभागाला अनेक पत्रं लिहावी लागली. त्यांनी सुमारे ५० आरटीआय अर्ज फाईल केले. अखेरीस रेल्वेने सर्व्हिस चार्ज म्हणून वसूल केलेले २.४२ कोटी रुपये रिफंड करण्यास मान्यता दिली. हे कोट्यवधी रुपये २.९८ लाख आरटीआय युझर्सच्या माध्यमातून वसूल करण्यात आले होते. यामध्ये अनेक युझर्सनी एकापेक्षा अनेक वेळा तिकीट बुक करून कॅन्सल केले होते.

स्वामी यांनी एप्रिल २०१७ मध्ये कोटा येथून दिल्लीला जाण्यासाटी गोल्डन टेम्पल मेलचं एक तिकीट बुक केले होते. ते २ जुलैच्या प्रवासासाठी होते. त्यानंतर बरोबर एका दिवसापूर्वी म्हणजेच १ जुलैपासून जीएसटी लागू झाला होता. त्यांनी ७६५ रुपयांमध्ये तिकीट बुक केले होते. जेव्हा त्यांनी तिकीट कॅन्सल केले तेव्हा ६५ रुपयांऐवजी १०० रुपये कापून त्यांनी ६६५ रुपयांचा रिफंड मिळाले. मात्र जीएसटी लागू होण्यापूर्वी तिकीट रद्द केले तरी सर्व्हिस चार्ज म्हणून ३५ रुपये कापले होते.

आरटीआयच्या माध्यमातून दीर्घकालीन लढाई लढल्यानंतर स्वामी यांना १ मे २०१९ रोजी ३३ रुपयांचे रिफंड मिळाले. तेव्हा सर्व्हिस टॅक्सच्या राऊंडेड ऑफ व्हॅल्यूच्या नावावर २ रुपये कापण्यात आले. त्यानंतर स्वामी यांनी २ रुपयांसाठी पुन्हा लढाई सुरू केली. अखेर गेल्या आठवड्यात त्यांना यश मिळाले. आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना २.९८ लाख युझर्सना संपूर्ण ३५ रुपरे रिफंड करण्याची माहिती दिली. तसेच बँक डिटेल्स पाठवल्यावर त्यांना २ रुपये परत मिळाले.  

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीIndian Railwayभारतीय रेल्वेMONEYपैसा