शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 11:41 IST

वंदे भारत ट्रेनमध्ये झांशीच्या बबीना मतदारसंघाचे आमदार राजीव सिंह त्यांच्या पत्नी आणि मुलासह दिल्लीहून झांशीला प्रवास करत होते.

नवी दिल्ली - दिल्लीहून भोपाळला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या एका प्रवाशाला झांशी रेल्वे स्टेशनवर टोळक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत प्रवासी गंभीर जखमी झाला. भाजपा आमदार राजीव सिंह यांच्या इशाऱ्यावर समर्थकांनी ही मारहाण केल्याचा आरोप प्रवाशाने केला. आमदाराच्या सांगण्यावरून जागेची अदलाबदल न केल्याने हा प्रकार घडला. प्रवाशाने जागा न बदलल्याचा राग मनात धरून भाजपा आमदाराने समर्थकांना बोलावून प्रवाशाला मारहाण केल्याचा आरोप आहे.

माहितीनुसार, राजीव सिंह हे झांशी येथील बबीना मतदारसंघातील आमदार आहेत. घटनेच्या दिवशी ते वंदे भारत ट्रेनने प्रवास करत होते. त्यांच्यासोबत पत्नी आणि मुलगाही होता. आमदाराला एका प्रवाशाच्या जागेवर बसायचे होते, त्यासाठी त्यांनी या प्रवाशाला जागेची अदलाबदल करण्याची मागणी केली. परंतु प्रवाशाने त्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या आमदारांनी समर्थकांना बोलावून त्या प्रवाशाला बेदम मारले. या प्रकरणाबाबत जीआरपी, आरपीएफ आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी पुष्टी केली परंतु कुणीही समोर येऊन बोलण्यास तयार नाही तर आमदार राजीव सिंह यांनी मी लिखित माझी बाजू मांडेन असं सांगितले आहे. सध्या झांशी जीआरपी स्टेशनमध्ये या प्रकाराची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

वंदे भारत ट्रेनमध्ये झांशीच्या बबीना मतदारसंघाचे आमदार राजीव सिंह त्यांच्या पत्नी आणि मुलासह दिल्लीहून झांशीला प्रवास करत होते. कोचमध्ये ८ नंबरवर राजीव सिंह, पत्नी कमल सिंह ५० नंबरवर तर श्रेयांश सिंह ५१ नंबरवर अशी तिकीट होती. वंदे भारत ट्रेन झांशी रेल्वे स्टेशनवर पोहचताच १०-१२ जण ट्रेनमध्ये घुसले आणि त्यांनी ४९ नंबरवर बसलेले प्रकाश नावाच्या प्रवाशाला मारहाण केली. पुढे काही करणार इतक्यात सिग्नल सुटल्याने ट्रेन भोपाळसाठी रवाना झाली. 

दरम्यान, मध्य प्रदेशच्या पन्ना येथील काँग्रेसचे माजी आमदार मुकेश नायक आणि माजी मंत्री रामनिवास रावत यांनी या घटनेबाबत एक्सवर पोस्ट करून ही माहिती समोर आणली. काँग्रेसने या घटनेचा हवाला देत प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला. एक वृद्ध व्यक्ती त्यांची जागा बदलण्यास नकार दिल्याने भाजपा आमदार राजीव सिंह यांच्या समर्थकांनी त्यांना बेदम मारले, त्यात त्यांच्या नाकातून रक्त आले. या प्रकारामुळे इतर प्रवाशांमध्येही दहशत पसरली. या प्रकरणावर ठोस कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसBJPभाजपा