शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

वायनाडमध्ये राहुल गांधींना ‘इंडिया’तील मित्रांचे आव्हान; एलडीएफची ॲनी राजा यांना उमेदवारी

By मयुरेश वाटवे | Updated: March 13, 2024 06:21 IST

राहुल गांधींनी भाजपाशी दोन हात करावेत. मतदारांना गरज असते, तेव्हा ते कधी मतदारसंघात येत नाहीत, असा आरोप एलडीएफने केला.

मयूरेश वाटवे, लोकमत न्यूज नेटवर्क, वायनाड : निवडणूक आयोग लोकसभेच्या निवडणुका कधी जाहीर करतो, याची उत्सुकता सर्वच पक्षांना लागली आहे. मात्र, तत्पूर्वीच वायनाड मतदारसंघात आतापासून ‘इंडिया’ आघाडीतील मित्रपक्षांमध्येच फटाके फुटू लागले आहेत. वायनाडमध्ये काँग्रेसचे विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्यासमोर लेफ्ट डेमॉक्रेटिक फ्रंटने (एलडीएफ) ॲनी राजा यांची उमेदवारी जाहीर करून आव्हान उभे केले.

वायनाड हा काँग्रेसचा गड असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. या मतदारसंघात अनुसूचित जमाती, वंचित आणि अल्पसंख्य समुदायांचे प्राबल्य आहे. गेल्या वेळी एलडीएफ उमेदवाराविरुद्धच राहुल गांधी जिंकले असले, तरी यावेळी एलडीएफने एक परिचित आणि मातब्बर चेहरा निवडणुकीत उतरवला आहे. ॲनी राजा या सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि नॅशनल फेडरेशन ॲाफ इंडियन वुमनच्या महासचिव आहेत.

राहुल यांनी भाजपशी दोन हात करावेत : डी. राजा

- एलडीएफ हा इंडिया आघाडीचा घटक पक्ष असताना, काँग्रेसने राहुल गांधी यांना या मतदारसंघातून उतरविण्यापूर्वी त्यांची लढाई कोणाशी आहे, याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे, असे ॲनी राजा यांचे पती व सीपीआय महासचिव डी. राजा यांचे म्हणणे आहे.

- राहुल गांधी हे मोठे नेते आहेत. त्यांनी मित्रपक्षांशी लढण्याऐवजी अन्य कोणत्याही मतदारसंघात थेट भाजपशी दोन हात करायला हवेत. आमची लढाई फॅसिस्ट शक्तींविरोधात आहे. आम्हाला त्याविरुद्ध लढायचे आहे.

- आपला उमेदवार उभा करणे हा काँग्रेसचा हक्क आहे; परंतु त्यांची विवेकबुद्धी जागृत होवो, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात एलडीएफची दावेदारी

एलडीएफने ॲनी राजासारखा राष्ट्रीय चेहरा वायनाडमधून उतरवण्यापूर्वी विचार करायला हवा होता. वायनाड हा काँग्रेसचा गड आहे. काँग्रेस इथून नेहमीच मोठ्या मताधिक्याने विजयी होत आला आहे, असे इंडियन युनियन मुस्लीम लीग नेते आणि माजी आमदार सी. मामुटी यांचे म्हणणे आहे.

२०१९ च्या तुलनेत आता परिस्थिती बदलली आहे. राहुल गांधी यांनी मतदारांची निराशा केली आहे. मतदारांना गरज असते, तेव्हा ते कधी मतदारसंघात येत नाहीत, असा आरोप एलडीएफने केला. मात्र, काँग्रेस नेत्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसwayanad-pcवायनाडINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी