शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

भारताचं विभाजन होणं ही ऐतिहासिक चूक; असदुद्दीन ओवैसींनी सांगितलं कोण जबाबदार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 08:03 IST

देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आजाद यांचे इंडिया विंस फ्रिडम हे पुस्तक वाचा असंही ओवैसी यांनी म्हटलं.

नवी दिल्ली – देशाचं विभाजन व्हायला नको होतं, ही एक ऐतिहासिक चूक आहे. देशाचं दुर्दैवाने विभाजन झालं. जे व्हायला नको होतं, भारत आणि पाकिस्तान हिंदू महासभेच्या मागणीवर बनला आहे, मोहम्मद अली जिन्ना यांच्यामुळे नाही असं विधान AIMIM प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. समाजवादी पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केलेल्या विधानावरून ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हैदराबादचे खासदार ओवैसी यांनी म्हटलं की, या देशाला ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. परंतु दुर्दैवाने देशाचे विभाजन झाले. असं व्हायला नको होते. मी फक्त हेच सांगू शकतो, परंतु जर तुम्ही यावर डिबेट ठेवले तर मी देशाच्या विभाजनाला खरे जबाबदार कोण हे सांगू शकतो. मी त्यावेळच्या या ऐतिहासिक चुकीवर केवळ एका ओळीत उत्तर देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आजाद यांचे इंडिया विंस फ्रिडम हे पुस्तक वाचा. त्यात कसं ते काँग्रेस नेत्यांकडे गेले आणि त्यांनी देशाच्या विभाजनाचा प्रस्ताव स्वीकार न करण्याचं आवाहन केले होते असंही ओवैसी म्हणाले. या देशाचे विभाजन नको व्हायला होते. विभाजन चुकीचे होते. त्याकाळी जितके नेते होते, ते सर्व यासाठी जबाबदार आहेत. जर तुम्ही मौलाना अबुल कलाम आजाद यांचे पुस्तक इंडिया विंस फ्रिडम वाचले तर मौलाना आजाद यांनी सर्व काँग्रेस नेत्यांना देशाचे विभाजन करू नका अशी मागणी केली होती असंही ओवैसींनी सांगितले.

दरम्यान, असदुद्दीन ओवैसी यांचे हे विधान अशावेळी आलंय जेव्हा पुढील महिन्यात तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. राज्यात ३० नोव्हेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत ओवैसी हे भाजपासोबतच काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत.

टॅग्स :IndiaभारतAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPakistanपाकिस्तान