शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

फूट पाडणाऱ्या भाजपचा जनतेकडून पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 06:26 IST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी; झारखंडमधील विजयाबद्दल व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली : झारखंड विधानसभा निवडणुकांत झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) व काँग्रेस आघाडीला मिळालेला विजय म्हणजे समाजात जाती-पाती, धर्माच्या आधारे फूट पाडण्याचे प्रयत्न करणाºया भाजपचा जनतेने केलेला पराभव आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे.

झामुमोचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीवर विश्वास दाखविल्याबद्दल त्या राज्यातील जनतेचे सोनिया गांधी यांनी आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळाल्याबद्दल त्यांनी हेमंत सोरेन, तसेच राज्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. सोनिया गांधी यांनी सांगितले की, भाजप व त्याच्या विद्वेषी भूमिकेचा झारखंड विधानसभा निवडणुकांत पराभव झाल्याने हा विजय खास व सद्य:स्थितीत अत्यंत महत्त्वाचा आहे. जातीपाती, धर्माच्या आधारे समाजामध्ये फूट पाडणाºया या पराभवामुळे अद्दल घडली आहे.

मतांमध्ये घट होऊनही झामुमोचे ११ आमदार जास्तझारखंड मुक्ती मोर्चाला यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमध्ये २०१४ च्या तुलनेत जवळपास दोन टक्के घट झाली आहे तरीही तो यंदा ११ जागा जास्त जिंकून ८१ सदस्यांच्या विधानसभेत सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष बनला आहे.दुसºया बाजूला भाजपची मते २०१४ च्या तुलनेत दोन टक्के वाढली आहेत तरीही त्याचे आमदार ३७ (२०१४) वरून २५ वर आले. २०१४ मध्ये झामुमोने १९ जागा जिंकल्या होत्या, त्या यंदा ३० झाल्या. तीन पक्षांच्या आघाडीच्या सरकारचे नेतृत्व झामुमो करणार आहे.भाजपने २०१४ मध्ये ३१.२६ टक्के मते मिळवली होती व ती यंदा ३३.३७ टक्क्यांवर गेली.

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019