शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

फूट पाडणाऱ्या भाजपचा जनतेकडून पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 06:26 IST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी; झारखंडमधील विजयाबद्दल व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली : झारखंड विधानसभा निवडणुकांत झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) व काँग्रेस आघाडीला मिळालेला विजय म्हणजे समाजात जाती-पाती, धर्माच्या आधारे फूट पाडण्याचे प्रयत्न करणाºया भाजपचा जनतेने केलेला पराभव आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे.

झामुमोचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीवर विश्वास दाखविल्याबद्दल त्या राज्यातील जनतेचे सोनिया गांधी यांनी आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळाल्याबद्दल त्यांनी हेमंत सोरेन, तसेच राज्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. सोनिया गांधी यांनी सांगितले की, भाजप व त्याच्या विद्वेषी भूमिकेचा झारखंड विधानसभा निवडणुकांत पराभव झाल्याने हा विजय खास व सद्य:स्थितीत अत्यंत महत्त्वाचा आहे. जातीपाती, धर्माच्या आधारे समाजामध्ये फूट पाडणाºया या पराभवामुळे अद्दल घडली आहे.

मतांमध्ये घट होऊनही झामुमोचे ११ आमदार जास्तझारखंड मुक्ती मोर्चाला यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमध्ये २०१४ च्या तुलनेत जवळपास दोन टक्के घट झाली आहे तरीही तो यंदा ११ जागा जास्त जिंकून ८१ सदस्यांच्या विधानसभेत सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष बनला आहे.दुसºया बाजूला भाजपची मते २०१४ च्या तुलनेत दोन टक्के वाढली आहेत तरीही त्याचे आमदार ३७ (२०१४) वरून २५ वर आले. २०१४ मध्ये झामुमोने १९ जागा जिंकल्या होत्या, त्या यंदा ३० झाल्या. तीन पक्षांच्या आघाडीच्या सरकारचे नेतृत्व झामुमो करणार आहे.भाजपने २०१४ मध्ये ३१.२६ टक्के मते मिळवली होती व ती यंदा ३३.३७ टक्क्यांवर गेली.

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019