शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

पर्रीकर, अँथनी यांचे एकमेकांना आव्हान

By admin | Published: April 28, 2016 4:10 AM

संपुआ सरकारच्या कार्यकाळात अगुस्ता वेस्टलँड कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले

नवी दिल्ली : संपुआ सरकारच्या कार्यकाळात अगुस्ता वेस्टलँड कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आले होते, या काँग्रेसच्या दाव्याला संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आव्हान दिले आहे. इटलीच्या न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करून सात-आठ दिवसानंतर याबाबत प्रतिक्रिया देऊ, असे ते म्हणाले. माजी संरक्षणमंत्री व काँग्रेसचे नेते ए. के. अँथनी यांनी मात्र पर्रीकर आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवत सरकारला १0 प्रश्न विचारले.ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेल्या कंपनीला मेक इन इंडियामध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि त्यासाठी त्या कंपनीला काळ्या यादीतून काढण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. स्वत:ची कृती जनतेसमोर येऊ नये, यासाठीच काँग्रेसवर भाजप नेते खोटे आरोप करीत असल्याची टीकाही अँथनी यांनी केली. बंदी घातलेल्या कंपनीवरील प्रतिबंध का उठवण्यात आला? सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाने या कंपनीविषयी प्रतिकुल मत व्यक्त केले असतानाही कंपनीला मेक इन इंडियामध्ये सहभागी करून घेण्यासाठी अ‍ॅटर्नी जनरलचे मत का मागवले? नौदलासाठी २0१५ साली अगुस्ता वेस्टलँडची हेलिकॉप्टर्स का वापरण्यात आली? ही कंपनी आणि टाटा समूह यांच्या संयुक्त गुंतवणुकीला एफआयपीबीने २0१४ साली मंजुरी का दिली? आपली सीबीआयने चौकशी करावी, असा प्रस्ताव जेम्स खिस्तियनने केला, तेव्हा तो का अमान्य करण्यात आला? केरळमधील मच्छिमारांच्या मृत्यूस जबाबदार इटलीच्या खलाशांच्या सुटकेच्या बदल्यात काँग्रेस नेत्यांना अडकवण्याबाबत समझोता झाला, हे खरे आहे का? राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी या कंपनीशी व्यवहार केल्याने झालेल्या नुकसानीबाबत कॅगने ठपका ठेवला असताना त्याबाबत कारवाई का करण्यात आली नाही? असे ते १0 प्रश्न आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)