शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

"जय श्रीराम नाही, जय सियाराम बोला"; संसद परिसरात प्रियांका गांधींचा महिला खासदारांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:34 IST

प्रियांका गांधी यांनी महिला खासदारांसोबत साधलेल्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priyanka Gandhi: केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार झाल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीसंसदेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाल्या आहेत. यावेळी त्या संसदेत जात असून त्यांना ५१७ क्रमांकाची जागा देण्यात आली आहे. बुधवारी प्रियांका गांधी संसदेत पोहोचल्या तेव्हा काही महिला खासदारांनी त्यांना थांबवून त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. हात मिळवल्यानंतर संसदेच्या संकुलातील महिला खासदारांनीही प्रियांका गांधी यांना जय श्री राम म्हटले. त्यानंतर प्रियांका गांधी यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बुधवारी संसद संकुलात वेगळ्याच प्रकारचे वातावरण पाहायला मिळाले. काही महिला खासदारांनी वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांच्याशी हस्तांदोलन सुरू केले. हस्तांदोलन करताना महिला खासदारांनी प्रियंका गांधींना जय श्री राम म्हटले. त्यानंतर महिला खासदारांना प्रियांका गांधी यांनी हसून प्रत्युत्तर दिलं.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही महिला प्रियांका गांधी यांना संसदेच्या संकुलात भेटताना दिसत आहेत. प्रियांका गांधी त्यांच्याशी हस्तांदोलन करत असताना महिला खासदारांनी त्यांना जय श्री राम म्हटले. यावर प्रियांका यांनी आधी त्यांना जय हिंद असे उत्तर दिले आणि आपण महिला आहोत त्यामुळे जय सियाराम म्हणा. सीतेला सोडू नका, असं म्हटलं. प्रियांका गांधी यांनी हे म्हणताच महिला खासदारही हसताना दिसल्या.

काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सुप्रिया श्रीनेत यांनी प्रियांका गांधींचे कौतुक करताना, "जय सियाराम, आम्ही महिला आहोत, सीतेला सोडू नका. प्रियांका गांधीजींनी महिला खासदारांच्या जय श्री राम अभिवादनाला प्रत्युत्तर देत सीतेची आठवण करून दिली, जिच्याशिवाय प्रभू रामाचे नाव अपूर्ण आहे," असं म्हटलं.

राजकारणात पदार्पण केल्यानंतर प्रियांका तिच्या लोकसभा मतदारसंघ वायनाडसाठीही सक्रिय दिसत आहे. "सरकारकडे प्रियांका गांधी यांनी भूस्खलनामुळे बाधित कुटुंबांना आर्थिक मदतीची मागणी केली आहे. तसेच शासनाच्या योजनेची माहिती घेतली. वायनाडच्या लोकांना आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यांना अत्यल्प मदत मिळाली आहे. मला वायनाडच्या कृती आराखड्याबद्दल सरकारकडून जाणून घ्यायचे आहे," असं प्रियांका गांधींनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीParliamentसंसदBJPभाजपा