शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात; मणिपूर, महागाईवरुन विरोधक सरकारला घेरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 09:50 IST

मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि दिल्ली अध्यादेशावरून गदारोळ होण्याची भीती असताना आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.

नवी दिल्ली: संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. संसदेचे हे अधिवेशन ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या कालावधीत संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण १७ बैठका प्रस्तावित आहेत. या अधिवेशनात ३१ नवीन विधेयकं मांडली जाणार आहेत. या विधेयकांमध्ये दिल्ली अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी सरकार ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (दुरुस्ती) विधेयक, २०२३ देखील समाविष्ट आहे.

मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि दिल्ली अध्यादेशावरून गदारोळ होण्याची भीती असताना आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. मणिपूर हिंसाचारावर चर्चेत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे जाहीर करून काँग्रेसने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. तर दुसरीकडे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदीय नियम आणि सभापतींच्या निर्देशानुसार मणिपूरसह कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. तसेच विरोधक मणिपूर हिंसाचारसह महागाई, समान नागरी कायदा, ओडिशा रेल्वे दुर्घटना यासह विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.

मणिपूर हिंसाचारावरील चर्चेत कोणतीही तडजोड न करण्याच्या घोषणेवरून हे स्पष्ट झाले आहे की, यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी होऊ शकते. सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीएमसह सर्व विरोधी पक्षांनी मणिपूर हिंसाचारावर प्राधान्याने चर्चा केली. यासोबतच दिल्ली अध्यादेशाबाबत एकजूट विरोधकही आक्रमक दिसत असून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आणलेल्या या अध्यादेशाला आम आदमी पक्षासह सर्वच विरोधी पक्षनेत्यांनी लोकशाही आणि संविधानविरोधी म्हटले आहे.

राज्यसभेत खरी परीक्षा

या विधेयकावर ‘इंडिया’ची परीक्षा राज्यसभेत होणार आहे. कारण तेथे सरकारकडे बहुमत नाही. लोकसभेत सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे तेथे कोणतीही अडचण येणार नाही; परंतु राज्यसभेत भाजप व एनडीए मिळून ही संख्या १११ होते. २३७ सदस्यांच्या राज्यसभेत विधेयक पारित करण्यासाठी सरकारला ११९ संख्येची गरज भासणार आहे. ही संख्या विद्यमान सदस्य संख्येपेक्षा ८ ने जास्त आहे. या आठ खासदारांसाठी सरकारला बिजू जनता दल व वायएसआर काँग्रेसची मदत घ्यावी लागू शकते. दोन्ही पक्षांचे राज्यसभेत प्रत्येकी ९ सदस्य आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसनेही या विधेयकाच्या विरोधात मत देण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांची एकजूट कायम ठेवण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाची विधेयके कोणती?

या अधिवेशनात जे प्रमुख विधेयके मांडली जाणार आहेत, त्यात दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक २०२३, पोस्टल सेवा विधेयक, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक २०२३, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि बँक विधेयक २०२३, जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक २०२३, जम्मू आणि काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक २०२३, प्रेस आणि मॅगझिन नोंदणी विधेयक २०२३ आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनBJPभाजपाcongressकाँग्रेसManipur Violenceमणिपूर हिंसाचार