शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

कृषी कायद्यावरून दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ; संसदेचे कामकाज तहकूब

By देवेश फडके | Updated: February 2, 2021 17:26 IST

विरोधकांनी कृषी कायद्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने दोन्ही सभागृहातील कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. 

ठळक मुद्देसंसदेच्या दोन्ही सभागृहात शेतकरी आंदोलनाचा मुद्दा तापलाकेंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची विरोधकांची मागणीराज्यसभेत विरोधकांची घोषणाबाजी

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे नियमित कामकाज सुरू झाले. मात्र, विरोधकांनी कृषी कायद्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने दोन्ही सभागृहातील कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. 

राज्यसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांवर चर्चा व्हावी, यासाठी नोटीस दिली. तर बहुजन समाज पक्षाचे सदस्य अशोक सिद्धार्थ यांनी स्थगन प्रस्ताव दिला. मात्र, सभापती वैंकय्या नायडू यांनी उद्या शेतकऱ्यांच्या मुद्यावर चर्चा होईल, असे स्पष्ट केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करण्यावर सहमती झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधी बाकावरील सदस्य मात्र चर्चेच्या मुद्यावर ठाम राहिले आणि सभात्याग केला. 

ममता बॅनर्जींचा थोडा हटके अवतार; विवाह सोहळ्यात वाद्यांच्या तालावर थिरकल्या

दिवसभरासाठी राज्यसभा तहकूब

शेतकऱ्यांच्या मुद्यावरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. यानंतर राज्यसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला. तीनवेळा कामकाज तहकूब केल्यानंतर अखेर साडेबारा वाजता राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. आता उद्या (बुधवारी) सकाळी नऊ वाजता राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. 

लोकसभेतही काँग्रेसकडून स्थगन प्रस्ताव

राज्यसभेप्रमाणे लोकसभेतही सदस्यांनी कृषी कायद्याविरोधात शेतकरीआंदोलनाचा मुद्दा उचलून धरला. लोकसभेतही अनेकदा कामकाज तहकूब करावे लागले. दरम्यान, काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. यामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्यावरून स्थगिती प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी कायद्याचा प्रश्न चांगलाच तापणार असल्याचे पाहायला मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाFarmerशेतकरीagitationआंदोलन