शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सरकारची बुलडोझर मानसिकता; काँग्रेसची बोचरी टीका, हंगामी अध्यक्षाच्या नियुक्तीवरुन वाद...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 15:58 IST

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप खासदार भर्तृहरी महताब यांची १८ व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

Parliament Protem Speaker : लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांच्या नजरा 24 जूनपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनावर लागल्या आहेत. 18 व्या लोकसभेचे अध्यक्षपद कुणाकडे असणार, यावरुन सुरू असलेल्या चर्चांदरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपचे खासदार भर्तृहरी महताब यांची हंगामी अध्यक्षपदी (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती केली आहे. पण, आता या नियुक्तीवरुन नवा वाद सुरू झाला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत, हे संसदीय परंपरेच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

जयराम रमेश म्हणाले की, परंपरेनुसार ज्येष्ठ खासदाराची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते. प्रथेनुसार कोडीकुन्नील सुरेश यांची या पदावर नियुक्ती व्हायला हवी. पण, त्यांची नियुक्ती न करणे, ही सरकारची बुलडोझरची मानसिकता आहे. सरकार पहिल्या दिवसापासून मनमानी कारभार करत आहे. 

रमेश पुढे म्हणाले की, काँग्रेसचे कोडीकुन्नील सुरेश आणि वीरेंद्र कुमार (भाजप) हे दोघेही 18 व्या लोकसभेत त्यांचा आठवा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. 2019 मध्ये वीरेंद्र कुमार आणि 2014 मध्ये कमलनाथ हंगामी अध्यक्ष बनले होते. वीरेंद्र कुमार आता मंत्री झाले आहेत, त्यामुळे केोडीकुन्नील सुरेश यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती व्हायला हवी होती, पण सरकारने तसे केले नाही.

भाजप बुलडोझर राजकारणाच्या मानसिकतेतून बाहेर आले नाही. पहिल्या दिवसापासून त्यांना स्पर्धा करायची आहे. आम्हीच सरकार आहोत, हे दाखवायचे आहे. मात्र, जनादेश पंतप्रधानांच्या विरोधात आहे. ते (पीएम मोदी) आता 'श्री 400' नसून 'श्री 240' आहेत, अशी बोचरी टीकाही रमेश यांनी यावेळी केली.

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेस