शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सरकारची बुलडोझर मानसिकता; काँग्रेसची बोचरी टीका, हंगामी अध्यक्षाच्या नियुक्तीवरुन वाद...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 15:58 IST

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप खासदार भर्तृहरी महताब यांची १८ व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

Parliament Protem Speaker : लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांच्या नजरा 24 जूनपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनावर लागल्या आहेत. 18 व्या लोकसभेचे अध्यक्षपद कुणाकडे असणार, यावरुन सुरू असलेल्या चर्चांदरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपचे खासदार भर्तृहरी महताब यांची हंगामी अध्यक्षपदी (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती केली आहे. पण, आता या नियुक्तीवरुन नवा वाद सुरू झाला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत, हे संसदीय परंपरेच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

जयराम रमेश म्हणाले की, परंपरेनुसार ज्येष्ठ खासदाराची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते. प्रथेनुसार कोडीकुन्नील सुरेश यांची या पदावर नियुक्ती व्हायला हवी. पण, त्यांची नियुक्ती न करणे, ही सरकारची बुलडोझरची मानसिकता आहे. सरकार पहिल्या दिवसापासून मनमानी कारभार करत आहे. 

रमेश पुढे म्हणाले की, काँग्रेसचे कोडीकुन्नील सुरेश आणि वीरेंद्र कुमार (भाजप) हे दोघेही 18 व्या लोकसभेत त्यांचा आठवा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. 2019 मध्ये वीरेंद्र कुमार आणि 2014 मध्ये कमलनाथ हंगामी अध्यक्ष बनले होते. वीरेंद्र कुमार आता मंत्री झाले आहेत, त्यामुळे केोडीकुन्नील सुरेश यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती व्हायला हवी होती, पण सरकारने तसे केले नाही.

भाजप बुलडोझर राजकारणाच्या मानसिकतेतून बाहेर आले नाही. पहिल्या दिवसापासून त्यांना स्पर्धा करायची आहे. आम्हीच सरकार आहोत, हे दाखवायचे आहे. मात्र, जनादेश पंतप्रधानांच्या विरोधात आहे. ते (पीएम मोदी) आता 'श्री 400' नसून 'श्री 240' आहेत, अशी बोचरी टीकाही रमेश यांनी यावेळी केली.

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेस