शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

सरकारची बुलडोझर मानसिकता; काँग्रेसची बोचरी टीका, हंगामी अध्यक्षाच्या नियुक्तीवरुन वाद...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 15:58 IST

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप खासदार भर्तृहरी महताब यांची १८ व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

Parliament Protem Speaker : लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांच्या नजरा 24 जूनपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनावर लागल्या आहेत. 18 व्या लोकसभेचे अध्यक्षपद कुणाकडे असणार, यावरुन सुरू असलेल्या चर्चांदरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपचे खासदार भर्तृहरी महताब यांची हंगामी अध्यक्षपदी (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती केली आहे. पण, आता या नियुक्तीवरुन नवा वाद सुरू झाला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत, हे संसदीय परंपरेच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

जयराम रमेश म्हणाले की, परंपरेनुसार ज्येष्ठ खासदाराची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते. प्रथेनुसार कोडीकुन्नील सुरेश यांची या पदावर नियुक्ती व्हायला हवी. पण, त्यांची नियुक्ती न करणे, ही सरकारची बुलडोझरची मानसिकता आहे. सरकार पहिल्या दिवसापासून मनमानी कारभार करत आहे. 

रमेश पुढे म्हणाले की, काँग्रेसचे कोडीकुन्नील सुरेश आणि वीरेंद्र कुमार (भाजप) हे दोघेही 18 व्या लोकसभेत त्यांचा आठवा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. 2019 मध्ये वीरेंद्र कुमार आणि 2014 मध्ये कमलनाथ हंगामी अध्यक्ष बनले होते. वीरेंद्र कुमार आता मंत्री झाले आहेत, त्यामुळे केोडीकुन्नील सुरेश यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती व्हायला हवी होती, पण सरकारने तसे केले नाही.

भाजप बुलडोझर राजकारणाच्या मानसिकतेतून बाहेर आले नाही. पहिल्या दिवसापासून त्यांना स्पर्धा करायची आहे. आम्हीच सरकार आहोत, हे दाखवायचे आहे. मात्र, जनादेश पंतप्रधानांच्या विरोधात आहे. ते (पीएम मोदी) आता 'श्री 400' नसून 'श्री 240' आहेत, अशी बोचरी टीकाही रमेश यांनी यावेळी केली.

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेस