शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

Parliament Monsoon Session: मोदी सरकारनं शब्द फिरवला; शेतकऱ्यांसह विरोधकांना लवकरच मोठा धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 15:59 IST

सहा महिन्यांपूर्वी दिलेला शब्द मोदी सरकारनं फिरवला; संसदेत गदारोळ होण्याची शक्यता

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशानाला आजपासून सुरुवात झाली आहे. संसदेच्या अधिवेशनात मोदी सरकारकडून कोणती विधेयकं मंजूर करून घेणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. यंदाच्या अधिवेशनात केंद्र सरकार वीज (संधोधन) विधेयक मांडणार आहे.  कृषी विधेयकांना आधीच शेतकरी विरोध करत आहेत. विरोधी पक्षांनीदेखील यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. याच विधेयकाच्या मुद्द्यावरून पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाचा जुना मित्र असलेल्या शिरोमणी अकाली दलानं एनडीएची साथ सोडली. आता अकाली दल या विधेयकाविरोधात स्थगन प्रस्ताव आणणार आहे.

अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी रविवारी एक ट्विट केलं होतं. 'आधी कृषी कायदे आणि आता वीज संशोधन विधेयक. हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार नाही, असं शेतकऱ्यांना मोदी सरकारनं सांगितलं होतं. मात्र आता हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे. विजेचं खासगीकरण करून सरकार शेतकऱ्यांना शार्क माशांच्या तोंडात फेकत आहे,' असं कौर यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

गेल्या वर्षाच्या अखेरीस सरकारची शेतकरी संघटनांच्या नेत्यांसोबत चर्चा झाली. त्यातील सहाव्या बैठकीत केंद्र सरकारनं एक महत्त्वाचं आश्वासन दिलं होतं. वीज संशोधन विधेयकाचा मसुदा मागे घेण्यात येईल, असा शब्द सरकारनं दिला होता. मात्र या बैठकीला जेमतेम सहा महिने पूर्ण झाले असताना सरकारनं आपला शब्द फिरवला आहे. वीज संशोधन विधेयक सरकार संसदेत मांडणार आहे. त्यामुळे आंदोलक शेतकरी आणखी आक्रमक पवित्रा घेऊ शकतात. या विधेयकासोबतच कृषी कायद्यांविरोधात अकाली दलानं आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर चर्चा करण्याची त्यांची मागणी आहे. यासाठी अकाली दलानं शिवसेना, राष्ट्रवादी, डीएमके, टीएमसी आणि बीएसपी यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.  

 

टॅग्स :FarmerशेतकरीBJPभाजपाShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दल