शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Parliament Monsoon Session: मोदी सरकारनं शब्द फिरवला; शेतकऱ्यांसह विरोधकांना लवकरच मोठा धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 15:59 IST

सहा महिन्यांपूर्वी दिलेला शब्द मोदी सरकारनं फिरवला; संसदेत गदारोळ होण्याची शक्यता

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशानाला आजपासून सुरुवात झाली आहे. संसदेच्या अधिवेशनात मोदी सरकारकडून कोणती विधेयकं मंजूर करून घेणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. यंदाच्या अधिवेशनात केंद्र सरकार वीज (संधोधन) विधेयक मांडणार आहे.  कृषी विधेयकांना आधीच शेतकरी विरोध करत आहेत. विरोधी पक्षांनीदेखील यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. याच विधेयकाच्या मुद्द्यावरून पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाचा जुना मित्र असलेल्या शिरोमणी अकाली दलानं एनडीएची साथ सोडली. आता अकाली दल या विधेयकाविरोधात स्थगन प्रस्ताव आणणार आहे.

अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी रविवारी एक ट्विट केलं होतं. 'आधी कृषी कायदे आणि आता वीज संशोधन विधेयक. हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार नाही, असं शेतकऱ्यांना मोदी सरकारनं सांगितलं होतं. मात्र आता हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे. विजेचं खासगीकरण करून सरकार शेतकऱ्यांना शार्क माशांच्या तोंडात फेकत आहे,' असं कौर यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

गेल्या वर्षाच्या अखेरीस सरकारची शेतकरी संघटनांच्या नेत्यांसोबत चर्चा झाली. त्यातील सहाव्या बैठकीत केंद्र सरकारनं एक महत्त्वाचं आश्वासन दिलं होतं. वीज संशोधन विधेयकाचा मसुदा मागे घेण्यात येईल, असा शब्द सरकारनं दिला होता. मात्र या बैठकीला जेमतेम सहा महिने पूर्ण झाले असताना सरकारनं आपला शब्द फिरवला आहे. वीज संशोधन विधेयक सरकार संसदेत मांडणार आहे. त्यामुळे आंदोलक शेतकरी आणखी आक्रमक पवित्रा घेऊ शकतात. या विधेयकासोबतच कृषी कायद्यांविरोधात अकाली दलानं आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर चर्चा करण्याची त्यांची मागणी आहे. यासाठी अकाली दलानं शिवसेना, राष्ट्रवादी, डीएमके, टीएमसी आणि बीएसपी यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.  

 

टॅग्स :FarmerशेतकरीBJPभाजपाShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दल