शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'विंग कमांडर अभिनंदन यांची मिशी मोदी सरकारने 'राष्ट्रीय मिशी' म्हणून जाहीर करावी!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 16:03 IST

अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन लक्ष्य केलं.

नवी दिल्ली - एअर स्ट्राईचा हिरो आणि भारताच्या हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची मिशी राष्ट्रीय मिशी म्हणून घोषित करण्याची मागणी चक्क संसदेत करण्यात आली आहे. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांनी लोकसभा सत्रात बोलताना, अभिनंदन यांना त्यांच्या शौर्याबद्दल पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा. तसेच त्यांच्या मिशीला राष्ट्रीय मिशी घोषित करावी, अशी मागणीही चौधरी यांनी केली. 

अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन लक्ष्य केलं. तसेच, विंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्य पुरस्काराची मागणी करत त्यांची मिशी राष्ट्रीय मिशी म्हणून घोषित करण्याची मागणी केली. चौधरी यांच्या या मागणीमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विंग कमांडर अभिनंदन यांनी एअर स्ट्राईकवेळी पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. या हल्ल्यावेळी ते पाकिस्तान लष्कराच्या तावडीत सापडले. मात्र, तिथेही त्यांनी हिंमतीने उत्तरे देत भारताची शान वाढवली. त्यानंतर, भारत सरकारने अभिनंदन यांना पाकिस्तानच्या तावडीतून परत आणावे, यासाठी देशभरातून सरकारवर दबाव टाकण्यात आला. त्यामुळे, सरकारनेही पाकिस्तानवर दबाव टाकून अभिनंदन यांची सुटका केली. अभिनंदन यांची सुटका होताच, देशभरात या भारतमातेच्या पुत्राची वाहवा आणि शौर्याचे कौतुक करण्यात आले. तर, अभिनंदन यांच्या मिशीप्रमाणे कित्येक तरुणांनी स्वत:ची मिशी बनवून त्यांच्या शौर्याचे गोडवे गायले. विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धेतही रोहित शर्माच्या शतकानंतर अभिनंदन यांच्या मिशीप्रमाणे रोहितचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

अभिनंदन यांच्या शौर्याची कथाही शाळेतील पुस्तकात छापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अभिनंदन यांची देशभरात प्रचंड क्रेझ असून हीच क्रेझ आज संसदेत पाहायला मिळाली. संसदेत काँग्रेस नेत्यांनी अभिनंदन यांच्या मिशीला राष्ट्रीय मिशी म्हणून घोषित करण्याची मागणी केली. अमिताभ बच्चन यांच्या शराबी चित्रपटातील मुँछे हो तो नथ्थुराम जैसी हो... वरना ना हो... हा डॉयलॉग प्रंचड गाजला होता. त्यानंतर, मुँछे हो तो अभिनंदन जैसी हो... वरना ना हो... हा डॉयलॉग उद्यास आला आहे.  

 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानcongressकाँग्रेसIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक