शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे, विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत; भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 20:10 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक सातत्याने मणिपूरचा मुद्दा उपस्थित करत आहेत.

नवी दिल्ली- सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, यात मणिपूर हिंसाचारासह अनेक मुद्द्यांवर गदारोळ सुरू आहे. विरोधकांकडून सातत्याने सुरू असलेल्या गदारोळामुळे भाजप नेत्याने त्यांच्यावर सडकून टीका केली. विरोधी पक्ष संसदेत मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्यापासून पळ काढत आहेत. सरकारकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आहेत, हे माहीत असल्याने विरोधी पक्षांना चर्चेत रस नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. 

मणिपूरमधील घटनेबाबत विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीतील नेत्यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर केले. मणिपूर प्रकरणावर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांनी पंतप्रधान मोदींनी मणिपूरचा दौरा करावा, असेही म्हटले. 

सरकार चर्चेसाठी तयार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, सरकार चर्चेसाठी तयार आहे. मणिपूरला जाऊन आलेले गृहमंत्री अमित शहा उत्तर देण्यास तयार आहेत. विरोधकांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, तेच मला समजत नाही. 

अमित शहा उत्तर देण्यास तयार भाजप नेते सुशील मोदी यांनीही विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधी पक्षाचे नेते मणिपूर जाऊ शकतात, राष्ट्रपतींना भेटू शकतात, परंतु या मुद्द्यावर संसदेत होणाऱ्या चर्चेत भाग घेऊ शकत नाहीत. त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारकडे आहेत, हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना माहीत आहे, यामुळेच ते संसदेतील चर्चेपासून दूर पळत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा