शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

'महाराष्ट्रात सरकार पाडण्याची सुरुवात शरद पवारांनी केली'; अमित शहांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 19:22 IST

'वसंतदादा पाटलांचे सरकार पाडून शरद पवार मुख्यमंत्री बनले.'

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावावर 8-10 ऑगस्टदरम्यान चर्चा होणार आहे. या प्रस्तावावर काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी चर्चा सुरू केली आहे. यावेळी भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. भाजपाने 9 वर्षांत 9 सरकारे पाडल्याचा आरोप त्यांनी केला.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?यावेळी त्या म्हणाल्या की, भाजपाच्या काळात महागाई वाढली. महागाई रोखण्यात मोदी सरकार अपयशी झाले. मोदी सरकारच्या काळात दुध महागले. जगातील अनेक यादीत भारताची घसरण झाली. महागाई, बेरोजगारी हे मोदी सरकारचे सर्वांत मोठे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. वंदे भारत ट्रेन गरिबांसाठी नाही. मी वंदे भारतच्या विरोधात नाही, मात्र हे सत्य नाकारता येणार नाही. सरकारने त्यांच्या 9 वर्षांच्या काळात 9 सरकारे पाडली, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

अमित शहांचे प्रत्युत्तरदरम्यान, आज(दि.9) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अविश्वास प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विरोधकांवर एकापाठोपाठ एक घणाघाती टीका केल्या. यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंपासून इंदिरा गांधी आणि मणिपूर हिंसाचारापासून काँग्रेसच्या भ्रष्टाचारापर्यंत अनेक मुद्द्यांवरुन विरोधकांना घेतले. 

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या आरोपांचेही उत्तर दिले. शहा म्हणाले की, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही 9 वर्षात 9 सरकारे पाडली. पण, महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे काम सर्वात पहिले शरद पवारांनी केले. त्यांनीच वसंतदादा पाटलांचे सरकार पाढून जनसंघसोबत सरकार स्थापन केले आणि स्वतः मुख्यमंत्री झाले.

काँग्रेसवर घणाघाती टीकायावेळी शहांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराबाबत खंत व्यक्त करताना दिलेल्या रुपयाचे उदाहरण देत काँग्रेसची कोंडी केली. शह म्हणाले की, एकदा या देशाच्या तत्कालीन पंतप्रधानांनी सांगितलं होतं की, मी दिल्लीतून एक रुपया पाठवला तर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यातील केवळ 15 पैसेच पोहोचतात. तेव्हा ते नवीनच राजकारणात आले होते, प्रामाणिक व्यक्ती होते, बोलून गेले. पण मी आता पुढे विचारतो की, ते 85 पैसे पळवायचा कोण, असा टोला अमित शह यांनी लगावला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारParliamentसंसदlok sabhaलोकसभा