शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 19:06 IST

वक्फ सुधारणा विधेयकावरून देशात बराच वादंग निर्माण झाला आहे. त्यातच आसामच्या जमीयत उलेमा ए हिंद संघटनेकडून मोठा दावा करण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून देशभरात चर्चा सुरू आहे. सध्या हे विधेयक संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडे आहे. त्यातच आसामच्या जमीयत उलेमाचे प्रमुख नेते मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी मोठा दावा केला आहे. भारताची नवीन संसदेची इमारत वक्फ जमिनीवर बनली आहे असा दावा अजमल यांनी केला आहे. सर्व धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांनी या विधेयकाचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीवर (JPC) बहिष्कार टाकला आहे. ५ कोटी लोकांनी जेपीसीला सूचना करत या विधेयकावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केले आहे. त्यामुळे या विधेयकाबाबत किती नाराजी आहे हे दिसून येते असं मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी म्हटलं आहे.

मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी घोषणा केली की, जमीयत उलेमा ए हिंद आसाममधील वक्फ बोर्डाच्या जमिनींचे सर्वेक्षण करेल जेणेकरून या विधेयकाला आव्हान देता येईल. नवीन संसदेची इमारत ही वक्फच्या जमिनीवर बनली आहे. वक्फ जमिनीची यादी पाहा, त्यात संसदेचाही उल्लेख आहे. वसंत विहारपासून एअरपोर्ट ते दिल्ली एअरपोर्टही वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बनले आहे. हा जुना रेकॉर्ड आहे. दक्षिण भारतात चंद्राबाबू नायडू यांच्या राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हायकोर्ट उभारलं आहे. त्याला कुणी परवानगी दिली नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच वक्फच्या जमिनीवर कुणी काहीही करत आहे. ते अडचणीत येऊ शकतात. सरकार येत जात राहील. वक्फ बोर्डाच्या वादामुळे केंद्रातील सरकार जाईल, आमच्याकडे जुना भारताचा रिपोर्ट आहे, त्यात संसद वक्फ बोर्डाच्या जमिनीवर आहे हे असेल. मी १५ वर्ष संसदेत होतो, संसदेची जमीन वक्फच्या जागेवर आहे अशी चर्चा होती, त्यामुळे यावर संशोधन व्हायला हवं, आम्हीही संशोधन करू. अनेक वर्ष चर्चा होती, परंतु त्यावर संशोधनाची गरज पडली नाही. आता वक्फ विधेयक आल्यामुळे याचं संशोधन करण्याची गरज आहे. संसदेपासून आसामपर्यंत वक्फच्या जितक्या जागा आहेत त्या मुस्लिमांना मिळायला हव्यात अशी मागणी मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी केली.

दरम्यान, वक्फ १४०० वर्षापासून सुरू आहे, केवळ भारतात नाही तर जगभरात जमिनी आहेत. भारतातही हजारो वर्षापासून वक्फ प्रथा आहे. त्या हजारो वर्षात १२० वर्षापासून असलेली संसदेची इमारतही वक्फची जमीन असू शकते. वक्फ सुधारणा विधेयक आल्यामुळे या संशोधनाची गरज पडली. भाजपा सरकार वक्फच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न करतंय. जेपीसी संपूर्ण भारतातील संपत्तीविषयी आढावा घेत आहेत. जेपीसीत विरोधी खासदार त्याग करत आहेत. आम्ही हा मुद्दा पुढे आणला आहे त्यावर रिसर्च करावं असं मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी सांगितले.

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपा