शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
2
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
3
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
4
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
5
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
6
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
7
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
8
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
9
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
10
दिवाळीत स्वामींना घरी आणताय? आयुष्यभर सोबत करतील; अनंत कृपा होईल, स्थापनेचे ‘हे’ नियम पाळा!
11
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
12
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
13
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
14
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर
15
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
16
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
17
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
18
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
19
शांततेचे दूत! ट्रम्प यांच्यासाठी शाहबाज शरीफ यांच्याकडून नोबेलची मागणी; मेलोनींनी तोंडावर ठेवला हात
20
Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!

परीक्षा पे चर्चा: सोशल मीडियावर खिल्ली आणि टोलेबाजी; अखेर ‘ते’ ट्विट मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 08:49 IST

pariksha pe charcha: यावरून सोशल मीडियावर खिल्ली, टीका आणि टोलेबाजी करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देपरीक्षा पे चर्चा संदर्भातील काही ट्विट्स मागेसोशल मीडियावर टीका, खिल्ली आणि टोलेबाजीकुणाल कामरानेही केली होती टीका

नवी दिल्ली:पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील विद्यार्थ्यांशी बुधवारी संवाद साधला होता. पंतप्रधान मोदींनी  ‘परीक्षा पे चर्चा २०२१’ (pariksha pe charcha) या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमाद्वारे मार्गदर्शन केले. या संवादावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना कठीण प्रश्नाला आधी सामोरे जावे, असा सल्ला दिला. मात्र, यावरून सोशल मीडियावर खिल्ली, टीका आणि टोलेबाजी करण्यात आली. अखेर पंतप्रधान मोदींनी दिलेले सल्ल्याचे ट्विट्स मागे घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. (pariksha pe charcha pm office delet tweets related advice of pm modi to students on tough exam)

परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना अवघड प्रश्न आधी सोडवण्याच्या दिलेल्या  सल्ल्याची समाजमाध्यमावर विरोधी पक्ष व इतरांनी खिल्ली उडवल्यानंतर त्याबाबत पंतप्रधान मोदी यांच्या हवाल्याने दिलेले ट्विट संदेश केंद्र सरकारच्या प्रेस इनफॉर्मेशन ब्युरो आणि पंतप्रधान मोदी कार्यालयाने काढून टाकले आहेत.

पुढीलवेळी अर्णबच्या आधी रविश कुमारांना मुलाखत द्या; कुणाल कामराची मोदींवर टीका

सोपे प्रश्न आधी सोडवा तर अवघड नंतर सोडवा

परीक्षेत शिक्षक व पालक ‘सोपे प्रश्न आधी सोडवा तर अवघड नंतर सोडवा’ असे नेहमी सांगत असतात. पंतप्रधान म्हणून आधी अवघड विषयांना हात घालत असतो. सकाळी उठतो तेव्हा कठीण गोष्टींचा सामना करण्यासाठी सदैव तयार असतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. यावर,  मोदी यांनी नेमका उलटा सल्ला दिला, अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमावर उमटली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले सल्ल्याचे ट्विट्स डिलीट केल्याची माहिती मिळाली आहे. 

कुणाल कामरांची मोदींवर टीका

जे आवडते ते आपण आधी करतो, विद्यार्थी सहज, सोप्या आणि त्यांना आवडणाऱ्या विषयाचा जास्त अभ्यास करतात आणि कठीण विषयाला घाबरतात. उलट कठीण गोष्टींना आधी सामोरे जा. परीक्षेत असे म्हटले जाते की, सोपे आधी सोडवा, पण मी तर म्हणेन जे कठीण आहे त्याचा निपटारा सर्वात आधी करायला हवा, असे मोदी म्हणाले होते. यावर, असे असेल तर पुढीलवेळी अर्णब गोस्वामीला मुलाखत देण्याऐवजी रविश कुमार यांना मुलाखत देण्याचा प्रयत्न करुन बघावा, असे खोचक ट्विट कुणाल कामराने केले आहे.

दरम्यान, ‘परीक्षा पे चर्चा २०२१’ हा कार्यक्रम पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालयाच्या सर्व समाजमाध्यमांवर थेट प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी १३ लाखांहून अधिक शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी नोंदणी केली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रथमच सर्व जगातील इच्छुकांना निमंत्रित करण्यात आले होते.  

टॅग्स :examपरीक्षाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर