शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

भारतावर तिहेरी संकट! ISI, बांगलादेश अन् चीन यांची 'नापाक' खेळी; परेश बरूआला बनवलं प्यादं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:10 IST

चीनने त्याचा ठिकाणा बदलला असून त्याला युन्नान प्रांताच्या शिशुआंगबन्नाच्या स्वायत्त क्षेत्रात पाठवले आहे. त्यामागे म्यानमारमध्ये चाललेलं विद्रोही आंदोलन कारणीभूत आहे.

नवी दिल्ली - बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता उलथल्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात कट्टरपंथीचे सरकार आलं तेव्हापासून भारत आणि बांगलादेशाचे संबंध बिघडले आहेत. युनूस सरकारमधील लोक भारताविरोधात गरळ ओकत आहेत. त्याठिकाणी अल्पसंख्याक आणि विशेषत: हिंदूवरील अत्याचार वाढले आहेत. त्यात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयला बांगलादेशात बोलावून त्यांनी भारताला डिवचलं आहे. या सर्व घटना भारताची डोकेदुखी वाढवण्यासोबतच सहनशीलतेची परीक्षा घेण्यासारखं आहे. 

भारताविरोधात चीन आणि पाकिस्तान ही जोडी आधीच कुरापती करत आहेत. त्यात आता युनूस यांच्या नेतृत्वात बांगलादेशही त्यात सहभागी झाल्यानं भारतावर तिहेरी संकट उभं राहिले आहे. अलीकडेच आसामच्या विद्रोही संघटना ULFA (यूनाइटेड लिबरेशन फ्रँट ऑफ आसाम) चा प्रमुख परेश बरूआचा ठिकाणा बदलला आहे. पाकिस्तान, चीन, आयएसआयच्या कटात अडकून बांगलादेश बरूआला एक मोहरा म्हणून वापरत आहे. 

चीनने उल्फाचा प्रमुख बरूआ ठावठिकाणी बदलला

ULFA चा नेता परेश बरूआने त्याचा ठावठिकाणा बदलला आहे. सूत्रांनुसार पहिला तो अरुणाचल प्रदेशच्या म्यानमार बॉर्डरवरील रुईली येथे राहत होता. हा भाग चीनमध्ये येतो. अनेक वर्षापासून बरूआ त्याचठिकाणी वास्तव्य करतो. आता चीनने त्याचा ठिकाणा बदलला असून त्याला युन्नान प्रांताच्या शिशुआंगबन्नाच्या स्वायत्त क्षेत्रात पाठवले आहे. त्यामागे म्यानमारमध्ये चाललेलं विद्रोही आंदोलन कारणीभूत आहे.

ISI, बांगलादेश आणि चीनचा मोहरा कसा बनला बरूआ?

९० च्या दशकात आसाममध्ये दहशतवाद शिगेला पोहोचला होता तेव्हा ULFA चा परेश बरूआ भारतासाठी टेन्शन बनला. भारतीय सैन्याच्या कठोर भूमिकेनंतर बरूआ सीमेपलीकडून त्याचे संघटन चालवू लागला. तो बांगलादेशात गेला. बांगलादेशात खालिदा जिया यांचं सरकार कमकुवत झाल्यानंतर त्याला सरकारकडून संरक्षण मिळणे बंद झाले. बांगलादेशातील २००८ च्या निवडणुकीपूर्वी तो तिथून निसटला आणि रुईली येथे राहू लागला. २००९ ते २०२४ पर्यंत शेख हसीना यांचं बांगलादेशात सरकार होते, हसीना यांचे भारताची सलोख्याचे संबंध होते, ते कायम आयएसआय, चीन आणि पाकिस्तान समर्थिक बांगलादेशातील लोकांना कायम खटकत होते.

कट्टरपंथींचं सरकार येताच बांगलादेशात ISI पुन्हा सक्रीय

बांगलादेशात शेख हसीना यांचं सरकार गेल्यानंतर युनूस यांच्या नेतृत्वातील सरकारने आयएसआयला रेड कार्पेट टाकले. भ्रष्टाचारात अडकलेल्या खालिदा जिया यांना तुरूंगातून बाहेर काढले. युनूस सरकारने उघडपणे आयएसआयला बांगलादेशात आमंत्रित केले. त्यामुळे आयएसआयसाठी बांगलादेश पुन्हा खुलं मैदान झाले आहे. २०१४ च्या एका प्रकरणात परेश बरूआला बांगलादेशात मृत्यूची शिक्षा सुनावली. डिसेंबर २०२४ मध्ये त्याच्या शिक्षेला जन्मठेपेत बदलण्यात आले. 

पूर्वोत्तर भारतात शेकडो बंडखोर म्यानमारच्या सागिंग क्षेत्रातील सिंगकालिंग परिसरात पहाडी भागात लपलेले आहेत. देशात जातीय दंगली भडकल्या तर सैन्याचं या बंडखोरांवर फारसं लक्ष जाणार नाही असं तज्त्र सांगता. हे बंडखोर ULFA संघटनेचे असून ते आसामच्या स्वातंत्र्याची मागणी करतात. आता त्याच्या म्होरक्या बरूआचं ठावठिकाणा बदलणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. रुईली चीन म्यानमार सीमेवरील व्यापाराचे मोठे केंद्र आहे. इथून भारतीय सीमाही जवळ आहे. बरूआ याठिकाणाहून त्याचे नेटवर्क सहजपणे चालवू शकतो. मात्र म्यानमारमधील अस्थिरता त्यामुळे बरूआला शिशुआंगबन्ना सुरक्षित पर्याय आहे. भारताने आधीच बरूआला सोपवण्याची मागणी चीनकडे केली आहे. बांगलादेशात आयएसआय सक्रीय होणे, चीननं बरूआला संरक्षण देणे यातून बरूआचा वापर करून पूर्वोत्तर राज्यात दहशतवादी नेटवर्क उभारलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात भारताला सतर्क राहण्याची गरज आहे. 

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेशchinaचीनPakistanपाकिस्तानISIआयएसआय