शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

परमबीरसिंह देशातच; 48 तासांत होणार हजर, सुप्रीम कोर्टात माहिती; अटकेपासून मिळाले संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 09:13 IST

माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला अटकेपासून संरक्षण द्यावे. मला कुठेही पलायन करण्याची इच्छा नाही, असे परमबीरसिंह यांनी आपल्या वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एस. के. कौल व न्या. एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठापुढे स्पष्ट केले. 

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यास येत्या ४८ तासांत सीबीआय अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर होण्याची तयारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी दर्शविली आहे. महाराष्ट्रातील खंडणी प्रकरणासह अन्य फौजदारी गुन्ह्यांमध्ये अटक होण्यापासून त्यांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे. तसेच तपासात सहभागी व्हावे, असा आदेश न्यायालयाने परमबीर यांना दिला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ डिसेंबरला होणार आहे.मी काहीतरी चुकीचे केले आहे असे चित्र निर्माण होऊ नये. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला अटकेपासून संरक्षण द्यावे. मला कुठेही पलायन करण्याची इच्छा नाही, असे परमबीरसिंह यांनी आपल्या वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एस. के. कौल व न्या. एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठापुढे स्पष्ट केले. 

कारवाई केलेल्यांकडूनच तक्रारी दाखलपरमबीरसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, मी ज्या बुकी व खंडणीखोरांविरोधात कारवाई केली, तो प्रत्येक माणूस माझ्याविरोधात तक्रार दाखल करू लागला आहे. अशा वेळी मी व माझ्या सहकाऱ्यांनी काय करावे अशी अपेक्षा आहे? सुरक्षितता हवी असल्यास तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र मागे घ्यावे, असे राज्याच्या विद्यमान पोलीस महासंचालकांनी मला सांगितले होते, असा आरोपही परमबीर यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.

खंडणीखोर, भ्रष्ट पोलीस आणि बुकी यांच्याविरोधात गुन्हे दाखल केल्यामुळे पोलीस आयुक्तांना जीवाच्या भीतीने लपून बसावे लागत असेल तर सामान्य नागरिकांबाबत काय होत असेल, याची आम्हाला चिंता वाटते. महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आणि तत्कालीन पोलीस आयुक्त यांच्यातील हा खटला दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत चालला आहे. - सर्वोच्च न्यायालय. 

फरार होण्याची इच्छा नाही -- परमबीरसिंह नेमके कुठे आहेत हे कळत नाही तोपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळण्यासंदर्भातील त्यांच्या अर्जाची आम्ही दखल घेणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यातील सुनावणीत सांगितले होते. - याआधी अनेकदा नोटिसा तसेच वॉरंट बजावूनही परमबीर न्यायालयासमोर हजर झाले नव्हते. सोमवारी झालेल्या सुनावणीत त्यांच्या वकिलाने सांगितले की, परमबीरसिंह देशामध्येच आहेत. - त्यांना फरार होण्याची किंवा कुठेही पळून जायची अजिबात इच्छा नाही, पण ते महाराष्ट्रात गेल्यास तिथे त्यांच्या जीवाला धोका आहे. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालय