शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

प. बंगालमध्ये गायी चोरल्याच्या संशयावरून जमावाने मारहाण करत केली दोघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 02:25 IST

गायी चोरल्याच्या संशयावरुन जमावाने दोन जणांची मारहाण करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी पश्चिम बंगालच्या जलपैगुडी जिल्ह्यात घडली.

कोलकाता : गायी चोरल्याच्या संशयावरुन जमावाने दोन जणांची मारहाण करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी पश्चिम बंगालच्या जलपैगुडी जिल्ह्यात घडली.मृत एक व्यक्ती आसामचा तर, दुसरा पश्चिम बंगालमधील आहे. हफीजुल शेख (१९) आणि अन्वर हुसेन (१९) अशी मृतांची नावे आहेत.पोलिसांनी या दोन्ही हत्यांना दुजोरा देताना या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे रात्री एका पिकअप व्हॅनमधून गावातून चालले होते. या व्हॅनमध्ये सात गायी होत्या. बहुधा रस्त्यात भरकटल्यामुळे ते या गावातून जात होते. याचवेळी गावातील काही जणांनी ही व्हॅन रोखली. त्यानंतर व्हॅनचा चालक फरार झाला. पण, व्हॅनमधील दोन जणांना या जमावाने पकडले. हे गाय चोर आहेत असा संशय घेऊन गावकºयांनी त्यांची चौकशी केली. त्यानंतर या जमावाने त्यांना प्रचंड मारहाण केली. या व्हॅनची तोडफोड करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दोघांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी व्हॅनमधील या गायी ताब्यात घेतल्या आहेत. ही घटना धूपगडी शहरापासून १५ किमी अंतरावर बडहरिया गावात घडली. मृतातील हफीजुल शेख हा आसामच्या धुबडी जिल्ह्यातील रहिवासी होता. तर, अन्वर हुसेन पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यातील पातालहावा येथील रहिवासी होता. हे दोघे व्यापारी होते अथवा नाही याची माहिती अद्याप मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस