शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

पेपर झोपेत तपासले?; 12वीच्या 4 हजार विद्यार्थ्यांचे गुण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 12:24 PM

सीबीएसई बोर्ड परीक्षेतील बारावी पास विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या निकालात पुन्हा एकदा घोळ झाल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली - सीबीएसई बोर्ड परीक्षेतील बारावी पास विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या निकालात पुन्हा एकदा घोळ झाल्याचे समोर आले आहे. या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांनी फेरतपासणीसाठी अर्ज केले होते. त्यानंतर, चक्क 50 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे गुण वाढून आले आहेत. या परीक्षेतील टॉपर नागपूरमधील इशरिता गुप्ताने सर्वप्रथम फेरतपासणीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांनीही फेरतपासणीसाठी अर्ज केला.

इशरिता गुप्ताला राज्यशास्त्र विषयात कमी गुण मिळाले होते. तर इतर सर्वच विषयात 95 पेक्षा अधिक गुण होते. त्यामुळे इशरिताने फेरतपासणीसाठी अर्ज केला होता. त्यावेळी, इशरिताच्या 17 उत्तरांमध्ये चुकीच्या पद्धतीने गुण देण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर, दिल्लीतील एका विद्यार्थ्यालाही तीन उत्तरांमध्ये चुकीचे गुण दिल्याचे समोर आले. त्यानंतर सीबीएसई बोर्डाच्या ज्या विद्यार्थ्यांनी फेरतपासणीसाठी अर्ज केला. त्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना गुण वाढून मिळाले आहेत. बारावीतील 9111 विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्तपासणीसाठी अर्ज केला होता. त्यापैकी 4632 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत चूक आढळून आली आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या बरोबर उत्तरावरही शून्य गुण देण्यात आले होते. त्यांची उत्तरे न तपासताच त्यांना हे गुण देण्यात आले होते. याप्रकरणी सीबीएसईने 214 शिक्षकांची चौकशी सुरू केली आहे. 

टॅग्स :CBSE 12th Result 2018सीबीएसई बारावी परीक्षा निकाल २०१८HSC Result 2018बारावी निकाल २०१८examपरीक्षा