शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

३०० वटवाघळे मरण पावल्याने घबराट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 11:15 PM

बेलघाट येथे सुमारे ३०० वटवाघळे मरण पावल्याचे आढळून आले ती आमराई ध्रुवनारायण सिंग या व्यक्तीच्या मालकीची आहे.

गोरखपूर : चीनमध्ये वटवाघळातील कोरोना विषाणूचा माणसाला संसर्ग होऊन त्यातून या आजाराची भीषण साथ पसरली, अशी एक शक्यता वर्तविण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या बेलघाट भागातील एका आमराईत सोमवारी ३०० वटवाघळे मरून पडल्याने त्या परिसरातील लोक घाबरून गेले होते.

या घटनेची माहिती मिळताच अधिकारीवर्गाने घटनास्थळी धाव घेतली. वटवाघळांचे मृतदेह उत्तरीय तपासणी करण्यासाठी पाठवून देण्यात आले. त्यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे या तपासणीचा अहवाल हाती आल्यानंतर स्पष्ट होईल. कोरोना साथीचा व या वटवाघळांचा मृत्यूचा संबंध असल्याच्या अफवा समाजमाध्यमांतून पसरल्याने बेलाघाट परिसरातील नागरिक चिंताग्रस्त झाले होते.

हवेत उकाडा खूप वाढल्याने, तसेच या परिसरात पाण्याचीही टंचाई असल्यामुळे वटवाघळांचा तडफडून मृत्यू झाला असावा अशीही अफवा समाजमाध्यमांत पसरली. त्यामुळे वटवाघळांना पाणी प्यायला मिळावे म्हणून स्थानिक लोकांनी दयाबुद्धीने घराबाहेर भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवले.

बेलघाट येथे सुमारे ३०० वटवाघळे मरण पावल्याचे आढळून आले ती आमराई ध्रुवनारायण सिंग या व्यक्तीच्या मालकीची आहे. त्यांनी सांगितले की, आमराईच्या जवळ असलेल्या झाडांवर ही वटवाघळे राहात होती. तेथून जवळच एक वीटभट्टीही आहे. तिच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणानेही ही वटवाघळे मरण पावली असण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)

मृत्यूच्या कारणाबद्दल नाना तर्क

च्गोरखपूर जिल्ह्याचे वनाधिकारी अविनाशकुमार यांनी सांगितले की, मोठ्या संख्येने वटवाघळे मरण पावल्याची माहिती सोमवारी सकाळी आठ वाजता मिळाल्यानंतर, वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन सुमारे ५८ वटवाघळांचे मृतदेह ताब्यात घेतले व उत्तरीय तपासणीसाठी बरेली येथील इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूटला पाठविले. ही वटवाघळे प्रचंड उकाड्याने किंवा कीटकनाशकाचे प्राशन केल्याने मरण पावली असावित, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, दीनदयाळ उपाध्याय गोरखपूर विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विषयाचे प्राध्यापक पी. एच. पाठक यांनी सांगितले की, बेलघाटमधील वटवाघळांचा व्हाईट नोज नावाच्या आजाराने मृत्यू झाला असावा, असे वाटते. विदेशात या आजाराने असंख्य वटवाघळे मरण पावल्याच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या