शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च निकाल! निवडणुकांसाठी तिसरं मूल दत्तक दिलं तरीही 'उमेदवारी बाद अन् पद धोक्यात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 18:26 IST

ओडिशातील एका प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने आपले मत मांडले. ओडिशातील मीनासिंह मांझी या आदिवासी

नवी दिल्ली - निवडणूक लढविण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला. निवडणूक लढविण्यासाठी दोन मुलांचा नियम बंधनकारक आहे. त्यामुळे तीन मुले असणारा उमेदवार निवडणुकीस अपात्र आहे. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयातून पळवाट काढण्यासाठी एका उमेदवाराने तिसरे मूल दत्तक दिले होते. पण, सर्वोच्च न्यायालयाने तरीही संबंधित उमेदवाराला हा निर्णय लागू राहिल, असा आदेश बुधवारी दिला. 

ओडिशातील एका प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने आपले मत मांडले. ओडिशातील मीनासिंह मांझी या आदिवासी समाजातील सरपंचाने तिसऱ्या मुलाला जन्म दिला त्यानंतर या पदावर कायम राहण्यासाठी त्याने आपल्या तिसऱ्या मुलाला दत्तक दिले होते. मात्र, तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर उमेदवार ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी अपात्र असेल. तसेच पूर्वीपासूनच सदस्य असलेल्या व्यक्तीने तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर तो ग्रामपंचायत सदस्यासह सरपंच पदासाठीही अपात्र ठरतो, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. 

सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या.एस.के. कौल आणि न्या.के.एम.जोसेफ यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. पंचायत राज कायद्यानुसार, ज्या व्यक्तीला तीन मुले आहेत, अशा व्यक्तीला ग्रामपंचायत निवडणूक लढवता येत नाही. तसेच कोणतेही पद धारण करता येत नाही. ओडिशा हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध मीना मांझी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही हायकोर्टाचा हा निर्णय अबाधित ठेवला आहे.   

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElectionनिवडणूकsarpanchसरपंचRanjan Gogoiरंजन गोगोई